दैनिक चालु वार्ता
म्हसावद सर्कल प्रतिनिधी
सुनिल पाटिल
म्हसावद :- दिनांक २९/१२/२०२१ रोजी नंदुरबार आगारातील एस टी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर केले की आम्ही सर्व शोकाकुल एस . टी. कर्मचाऱ्यांना मे.उच्च न्यायालय मुंबई यांनी आमच्या ज्या कर्मचाऱ्यांचे निधन/मृत्यू झाले आहेत.त्यांच्या दुखवट्यात असल्याचे मान्य व कबूल केले आहे हे देखील मान्य केले आहे.तसेच त्यामुळे आमचे शोकावस्थेत मनोधैर्य ही खचले आहे.हे देखील मान्य केले . ज्यांचे एकमेव प्रमुख कारण हे संदर्भीय विषयानुसार होत असलेल्या रा. प.अधिकाऱ्यांच्या बेकायदेशीर कार्यवाही तथा धमक्या आहेत. ज्यामुळे संपुर्ण महाराष्ट्र भर रा.प.कामगार हा वैफल्यग्रस्त अवस्थेमुळे स्वतःची जीवन यात्रा संपवत आहे. जे लोकशाहीच्या दृष्टीने तसेच सुविधांनानुसार सुद्धा चुकीचे आहे. तरी आपण आमचे प्रमुखपालक या नात्याने संबंधितांना योग्य ते आदेश निगर्मीत करून आम्हाला संरक्षण प्रदान करावे.सदर आशायाचे निवेदन सादर करण्यात आले