दैनिक चालू वार्ता
अजय चव्हाण
प्रतिनिधी वानोळा सर्कल
वानोळा जि. प.गटात फेब्रवारी 2022 मध्ये जि. प.निवडणुका होण्याची शक्यता असून सर्वच पक्षांनी जनसंपर्क वाढविण्यास सुरुवात केली आहे, मागील वर्षी झालेल्या निवडणुकीत चार राष्ट्रीय पक्ष व एक प्रादेशिक पक्षांनी निवडणूक लढवली होती, त्यात काँग्रेस च्या वतीने संजय राठोड, राष्ट्रवादी काँग्रेसकडून बंडू पाटील भुसारे, शिवसेनेकडून विजय राठोड,भाजप क्या कोट्यातून मुंबई येथील विधीज्ञ रमण जायभाये, तर प्रादेशिक पक्षांकडून जो निवडणुकीत माघार घेईल असे सर्वांनाच वाटत असताना सेवा साम्राज्य पार्टी च्या वतीने अजय राजे चव्हाण यांच्या मार्गदर्शनखाली सचिदानंद आडे यांनी निवडणूक लढवून सर्वच प्रतिष्टीतांना धक्का दिला होता, सद्यस्थितीत वानोळा सर्कल वर काँग्रेस ची सत्ता असून संजय राठोड हे पुन्हा आपले नशीब आजमावत आहेत, तर वानोळा गावचे माजी जि. प. सदस्य तथा वानोळा परिसरात शिक्षणाचे रोपटे पेरणारे,आरोग्य ची सेवा उपलब्ध करून देणारे दिवंगत वानोळा गावचे जि. प. सदस्य मा. दत्तरामजी राठोड यांचे सुपुत्र कृष्णकुमार राठोड हे सुद्धा इच्छूक आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसकडून युवा उद्योजक कुंदन पाटील पवार यांना मा. आ. प्रदीप नाईक यांनी पुढील निवडणूकित संधी देण्याचे वचन दिले असल्याने यावेळेस त्यांनाच उमेदवार म्हणून जाहीर करण्यात येईल अशी अपेक्षा आहे, तर कुपटी येथील बंडू पाटील भुसारे सुद्धा इच्छूक आहेत, वानोळा येथील ज्येष्ठ कार्यकर्ते तथा शिक्षणातून विश्व निर्माण करणारे, सेवा निवृत्त प्राचार्य मा. वाय. एच.जाधव यांच्या पक्षनिष्टेमुळे पक्ष श्रेष्ठींनी त्यानांच उमेदवारी द्यावी अशी मागणी होत आहे, ते सध्या कीनवट- माहूर विधानसभा मतदार संघाचे सरचिटणीस आहेत,. वानोळा गावचे मा.उपसरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका सचिव अभिजित राठोड हे सुद्धा इच्छूक असून यांना या सर्कल मध्ये प्रचंड जनाधार आहे, पाचोंदा येथील गौतम महामुने हे सुद्धा इच्छूक आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस चे मा. जि. प. उपाध्यक्ष समाधान जाधव वाई गट सोडून वानोळा गटात संपूर्ण ताकदीनिशी लढविणार असल्याचे चित्र आहे, परंतु शेवटी सर्व निर्णय पक्षश्रेष्ठींवर अवलंबून आहे.
शिवसेनेच्या वतीने वानोळा जि. प. सर्कल मध्ये शिवसेना कमकुवत असून शिवसे ने तर्फे सध्या तरी एकमेव सुदर्शन नाईक इच्छूक आहेत,शिवसेनेच्या काही वरिष्ठ नेत्यांनी वानोळा सर्कल मध्ये दुर्लक्ष करून पक्ष वाढ करण्यासाठी दुर्लक्ष केले, आणि हीच घोडचूक त्यांना भोवणार असल्याचे छायाचित्र सध्या दिसत आहे, या ठिकाणी शिवसेनेला आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे.
भारतीय जनता पक्षाच्या पक्षाच्या वतीने सध्यातरी मुंबई येथील विधीज्ञ रमण जायभाये हे वरचढ असून ज्येष्ठ नेते धरमसिंग राठोड, मा. तालुकाध्यक्ष तथा वानोळा गावचे प्राध्यापक, संत सेवालाल बहुउद्देशिय संस्थेचे संस्थापक दिलीप राठोड, सुभाष राठोड, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष, समाजसेवक, राष्ट्रीय बंजारा परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष, रेणुका गॅस एजन्सी चे संचालक, युवा नेतृत्व,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुमित राठोड हे सुद्धा इच्छूक आहेत, या मतदार संघाचे गेम चेंजर आ. भिमराव केराम ठरणार आहेत,
पालाईगुडा गावचे किशोर पाटील पवार यांनी कुठल्याही राजकीय पक्षाच्या तिकिटावर वा वेळ पडल्यास अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले जात आहे,
सेवा साम्राज्य पार्टी च्या वतीने अजय राजे चव्हाण निवडणूक लढविणार आहे.
विविध आंदोलने,उपोषणे करून शेतकरी, कष्टकरी, यांना संघटनेच्या माध्यमातून न्याय मिळवून देणारे गोर सेनेचे माहूर तालुका अध्यक्ष प्रफुल जाधव हे सुद्धा जि. प. निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले जात आहे,
एकंदरीत आरक्षण सोडती नंतरच पुढील राजकीय समीकरण ठरणार आहे.