दै चालु वार्ता औरंगाबाद
मोहन आखाडे
उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे केंद्रीय मंत्र्यांच्या मूलाने शेतकऱ्यांचा अंगावर वाहने घातली. यात अनेक शेतकरी ठार झाले, भाजप सरकारचे मंत्री, त्यांची मुले मस्तवालपणे वागत आहेत.आता केंद्रातील सत्ताधाऱ्यांची वागणूक बदलावी, त्यांच्या या मस्तीचा आम्ही निषेध व्यक्त करत असून या मंत्र्यांच्या मुलाला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी आक्रमक प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यानी व्यक्त केली.
लखीमपूर येथे झालेल्या त्या घटनेच्या विरोधात सोमवारी (11 ऑक्टोबर) रोजी महाविकास आघाडी आणि घटक पक्षांनी राज्यव्यापी बंद पुकारला होता .या बंदमध्ये शिऊरकरांनी सहभागी होऊन शेतकऱ्यांना पाठींबा देत गावातील व्यावसायिक, व्यापारी यांनी काही अपवाद वगळता आपली दुकाने बंद ठेवत या बंद ला पाठींबा दिला.
महाविकास आघाडीच्या वतीने निषेध करण्यात आला, शिऊर गावात दुचाकी रॅली काढण्यात आली.
यावेळी माजी सरपंच बबनराव जाधव, माजी उपसरपंच नंदकिशोर जाधव, ग्रामपंचायत सदस्य , राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळा पाटील जाधव, ग्रा.पं सदस्य सुनील खांडगौरे, चांगदेव जाधव, विजय झिजूर्डे, संजय जाधव,अनिल भोसले, अकबर शेख, राजेंद्र वरपे, बाळू पवार, शिरीष चव्हाण, लड्डूभाई, संकेत चुडीवाल, रियाज कुरेशी, शुभम सूर्यवंशी, अर्षद शेख, रामेश्वर निकम, सिद्धू सूर्यवंशी आदी उपस्थित होते.