दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
मुंबई :- गोव्यात शिवसेना, भाजप, काँग्रेससह अन्य पक्षांनी तयारी सुरु केली आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. गोव्यात शिवसेना खासदार संजय राऊत विरुद्ध महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आणि गोव्याचे भाजप निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु आहे. यामध्ये फडणवीस आणि मी शत्रू नाही असे वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. अवघ्या काही दिवसांवर निवडणुका आल्या असताना या राज्यांमधील राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्राच्या बाजूला असणाऱ्या गोव्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये राऊतांनी राजकारणातील अनेक विषयांवर चर्चा केली आहे.
यामध्ये त्यांना भाजप नेते देवेंद्र फडणीस विरुद्ध शिवसेना खासदार संजय राऊत असे वातावरण झालं असल्याचा प्रश्न विचारण्यात आला. यावर राऊत म्हणाले की, खरं म्हणजे चित्र कुठे होऊ नये. देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत हे एकमेकांचे व्यक्तिगत शत्रू नाही. राजकारणात मतभेद असतात आणि ते लोकशाहीत असायला हवेत. महाराष्ट्रात त्यांचे सरकार आले नाही त्याला मी जबाबदार नाही. त्याला जबाबदार ते स्वतः आहेत. त्यांनी शब्द पाळला नाही त्यामुळे ही सत्ता आली असल्याचे संजय राऊत म्हणाले.