दै चालु वार्ता औरंगाबाद
मोहन आखाडे
लासुरगाव:- औरंगाबाद शहरापासून केवळ 45 किमी अंतरावर असलेले मुंबई-औरंगाबाद महामार्गावरील व औरंगाबाद-मनमाड रेल्वे मार्गावरील असलेले लासुरगाव या क्षेत्रातील श्री देवी दाक्षायणी मातेचे भव्य मंदिर असून प्रदीर्घ कालावधीनंतर कोरोना संकट काहीशे कमी झाल्यामुळे भाविकांच्या साठी दर्शनार्थ खुले करण्यात आले आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर मंदिर खुले झाल्यामुळे दर्शनासाठी भाविकांचा उत्साह मोठ्याप्रमाणावर जाणवत आहे. लासुरगाव भाविकांसाठी सज्ज असून पहाटे पाच वाजेपासून लासुरगाव व परिसरातील लासुर स्टेशन, शहाजपुर, जळगाव, पिंपळगाव, राहेगाव, राजुरा, धोंदलगाव, बायगाव, आधी गावातून लोक पायी दर्शनासाठी येत आहेत मंगळवारी सातवी माळ असल्यामुळे संपूर्ण जिल्हा सह खानदेश, जळगाव, चाळीसगाव, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, आदी परिसरातून लोक मातेच्या दर्शनार्थ येत आहेत भाविकांचा उत्सव ओसंडून वाहत आहे. आज मंगळवारी हजारो भाविकांनी मातेचे दर्शन घेतले पहाटे पाच वाजेपासून ते रात्री दहा वाजेपर्यंत मंदिर बंद होण्याच्या वेळेपर्यंत हजारो भाविकांनी मातेचे दर्शन घेतले वाहनांच्या एक किमी पर्यंत रांगा लागल्या होत्या. मातेची आख्यायिका (श्री देवी दाक्षायणी) दक्ष राजाची राजधानी लासूरनगरी (दक्षनगरी)दक्ष राजाची कन्या दाक्षायणी मातेचे येथे वास्तव्य आहे दक्षराजास सात कन्या होत्या त्यापैकी एक दाक्षायणी दक्षिण दिशेकडे मुख असलेली दाक्षायणी मातेचे पुरातन मंदिर आहे भारतात दक्षिणेकडे मूक असलेले एकमेव मंदिर आहे दक्ष राजाने येथे एक यज्ञ सोहळा आयोजित केला होता त्या यज्ञ सोहळ्यास त्याने आपल्या सर्व कन्यांना आमंत्रण दिले पण दाक्षायणी ही शिवाची पत्नी असल्याने व शिव स्मशानात राहतात व त्यांचा वेश सर्वांपेक्षा वेगळा आहे त्यामुळे आपला अपमान होईल या भीतीने दक्ष राजाने दाक्षायणीस यज्ञाचे आमंत्रण दिले नाही शंकराची पत्नी दाक्षायणी माता ही म्हणे की पित्याच्या घरी जाण्यास मला आमंत्रणाची गरज नाही त्यामुळे मी स्वतः यज्ञ सोहळ्यात जाईल आपण आला नाही तरी चालेल. सर्व जाणते श्री महादेव यांना पुढील सर्व ज्ञात झाल्याने त्यांनी दाक्षायणी अडवण्याचा प्रयत्न केला पण स्त्रि आट्टा पुढे त्यांचे काही चालू शकले नाही व त्यांनी दाक्षायणी मातेस व नंदिकेश्वरास जाण्यास आज्ञा दिली दाक्षायणी माता यज्ञात हजर झाली तिथे येताच तिला आपला होणारा अपमान व आपल्या पतीस योग्य स्थान न दिल्यामुळे अपमान सहन झाला नाही व क्रोधित होऊन दाक्षायणी मातेने यज्ञात स्वतः आहुती दिली त्यानंतर महादेवाला राग अनावर होऊन त्यानी लासूर नगरीत प्रवेश केला व दक्ष राजाचा शिरच्छेद करून सर्व लासूर नगरीचा विध्वंस केला अशाप्रकारे दाक्षायणी ची अख्यायिका सांगितली जाते. विश्वस्त मंडळ स्थापनेनंतर मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला मंदिराच्या मालकीची परिसरात अडीचशे एकर जमीन असून मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले आहे त्याचप्रमाणे श्री देवी दाक्षायणी मातेचे चांदीचे सिंहासन, मुख्य गाभारा, सभामंडप, होम मंडप, नगारखाना, दीपमाळ, महादेव मंदिर, संत शिवाई मंदिर, राधाकृष्ण, काशी निवासी महाराज मंदिर, पूर्ण झाले आहेत मंदिराच्या वतीने भक्तांसाठी भक्तनिवास, व्यापारी संकुल तयार केली आहेत लग्नसोहळ्यासाठी मंगल कार्यालय ही उपलब्ध आहे त्याच प्रमाणे अजूनही अनेक उपक्रम विचाराधीन आहेत त्यासाठी सर्व भाविक भक्तांनी आई भगवतीचा आशीर्वाद घेऊन संपूर्ण विधायक कार्यासाठी फुल ना फुलाची पाकळी मंदिरास अर्पण करावे व भगवतीचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा. कोरोणा संकट कायमस्वरूपी जाऊ दे अशी प्रार्थना भाविक भक्तांना तर्फे करण्यात येत आहे मंदिराचे अध्यक्ष कल्याणचंद मुनोत, उपाध्यक्ष शिवाजीराव भिसे, सचिव आसाराम शेजुळ, विश्वस्त सुभानराव देशमुख, राधेश्याम शर्मा, जगन्नाथराव हरिष्चंद्रे, किशोर कुलकर्णी, तसेच पदसिद्ध विश्वस्त राहुल गायकवाड तहसीलदार वैजापूर. मंदिराचे व्यवस्थापक विष्णू हरिष्चंद्रे सह सर्व कर्मचारी नवरात्र उत्सव काळात कर्तव्य बजावत आहेत.
किशोर कुलकर्णी
संस्थापक अध्यक्ष तथा विश्वस्त
श्री देवी दाक्षायणी मंदिर संस्थान लासुरगाव यांनि माहिती दिलि