
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद प्रतिनिधी
मोहन आखाडे
औरंगाबाद :- औरंगाबाद शहरातील क्रांती चौक येथे छत्रपती शिवरायांचा पुतळा चौथऱ्यावर बसविण्यासाठी महापालिकेने काम सुरू केले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे. शिवप्रेमींच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर परवा मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा शहरातील क्रांती चौकात दाखल झाला होता. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अखेर चबुतऱ्यावर बसवण्यात यश आलं आहे.
क्रांती चौक इथल्या चबुतऱ्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा 48 तासांच्या प्रयत्नानंतर बसवण्यात आला आहे. गेल्या 48 तासात पासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चबुतऱ्यावर बसविण्याचे प्रयत्न सुरु होते. अखेर पहाटे पाच वाजता चबुतऱ्यावर पुतळा बसवण्यात आला आहे.