
दैनिक चालु वार्ता
परतूर प्रतिनिधी
नामदेव तौर
परतूर :- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत बंद सुरू आहे. त्यामुळे कामगारांच्या कुटुंबीयांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे तसेच आर्थिक विवंचनेला कंटाळून ८३ कर्मचाऱ्यांनी आत्मत्याग केला. त्यांच्या दुःखात सामील होऊन गेल्या तीन महिन्यापासून त्यांचा दुखवटा पाळून परतुर आगारातील एसटी कर्मचारी विलीनीकरणाचा लढा लढत आहेत.
परंतु महामंडळाने गेल्या तीन महिन्यापासून कामगारांना पगार न दिल्याने त्यांचे कुटुंब आर्थिक विवंचनेत सापडले असून त्यांच्या मनात नाना प्रकारचे विचार येत आहेत त्याची जाण ठेऊन
या पार्श्वभूमीवर काही मदत करता येईल का या उद्देशाने तसेच भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील आणि माजी पाणी पुरवठा मंत्री तथा आमदार बबनरावजी लोणीकर यांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन भाजपा युवा मोर्चा जालना जिल्हा सरचिटणीस तथा दैठना खुर्द चे सरपंच संपत दादा टकले यांनी त्यांचा मुलगा शंभूराजे टकले यांचा जन्मदिन साधेपणाने साजरा करून व्यर्थ खर्च टाळून आगारातील एसटी कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबाला किमान एका महिन्याचे राशन पुरेल इतके अन्नधान्य किट वाटप करण्यात आले.
माननीय आमदार बबनरावजी लोणीकर यांच्या उपस्थितीत भाजपा युवा मोर्चा जालना जिल्हा सरचिटणीस तसेच दैठणा खुर्द चे सरपंच संपत दादा टकले यांनी सर्वच गरजू एसटी कर्मचाऱ्यांना यावेळी राशन वाटप केले. त्यांच्या या स्तुत्य विचारातून परतुर आगारातील गरजू कामगारांना राशन दिले बद्दल गणेश कानडे, कल्याण सोळंके, भुजंग माकोडे, मुकुंद भालेराव, राजबिंडे तसेच इतर सर्वच एसटी कामगारांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले…