दैनिक चालु वार्ता
अक्कलकुवा प्रतिनिधी
आपसिंग पाडवी
बालाघाट :- रब्बी हंगामातील शेती साठी पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी बालाघाट(देवबारी) येथील कालूसिंग वसावे व त्यांच्या सहकारी शेतकरी बांधवांनी मिळून बालाघाट (देवबारीपाडा)येथे वनराई बंधारा साकार केला आहे.दर वर्षी आपल्या शेतीला लागणारे रब्बी हंगामातील पाणी नियोजन हे वनराई बंधाऱ्याच्या साहयाने करतात.या पाण्याचा उपयोग शेजारील शेतकरी आपल्या शेती साठी व जनावरांना पाणी पिण्यासाठी करतात.
या बंधाऱ्यासाठी कालूसिंग वसावे यांनी कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार (कोळदा)चे जयंत उत्तरवार सर यांची मदत घेतली व मोलगी परिसर सेवा समितीच्या मार्गदर्शनाखाली बंधारा पूर्ण करण्यात आला.तसेच या बंधाऱ्यासाठी गावांतील शेतकरी स्वरूपसिंग वसावे,कालुसिंग तडवी, प्रतापसिंग वसावे,नरपत वसावे बालाघाट त्याच प्रमाणे मोलगी परिसर सेवा समितीचे मनोहर पाडवी,रवी तडवी,आपसिंग वसावे यांचे सहकार्य लाभले.