दैनिक चालु वार्ता
शहादा ग्रामीण प्रतिनिधी
पूनम पवार
शहादा :- शहादा तालुक्यातील कोंढावळ येथील कांशीराम विश्राम माळी यांच्या शेतात ट्रांसफामॅवरील शाटॅ सकिंटमुळे लागलेल्या आगीत अडीच एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली. याला फक्त महावितरण कंपनीची भोंगळ कारभारामुळेच शाटॅ सकिंटमुळे झाले असेल अशी शेतकरी बोलू लागले आहेत.यात शेतकर्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तरी संबधित विभागाने त्वरीत पंचनामा करून त्या शेतकर्याना आपल्या पिकांची भरपाई मिळावी अशी मागणी संबधित शेतकरी करू लागला आहे.