ज्याप्रमाणे ब्रिटिशांच्या काळात लोकमान्य टिळकांनी “केशरी” हे वृत्तपत्र सुरू करून ब्रिटिशांना भारतातून पळवून लावले त्याप्रमाणे “दैनिक चालू वार्ता” हे वृत्तपत्र अन्याय व गुलामीविरुद्ध वाचा फोडण्याचे काम करीत आहे.तसेच हे वृत्तपत्र गरीब व गरजू लोकांना त्यांचा योग्य तो हक्क मिळवून देण्याचे काम करीत आहे. त्यामुळे दैनिक चालू वार्ता हे वृत्तपत्र लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ बनला आहे.या वृत्तपत्रातून दररोज गाव ते देशात घडणाऱ्या ताज्या घडामोडी वाचायला मिळत आहेत.
तसेच यामध्ये क्रिडा, कला, मनोरंजन, राजकीय,शैक्षणिक आणि इतर विविध क्षेत्रातील बातम्या ह्या अगदी सविस्तरपणे वाचण्यासाठी मिळत आहेत. या वृत्तपत्रातील दररोज येणाऱ्या नोकरीविषयक येणाऱ्या जाहिरातीमुळे तरूण वर्गाला नवीन-नवीन नोकरीच्या संधी प्राप्त होत आहेत. तसेच नवीन तरुण उद्योजकांना व्यापारी क्षेत्रात यश मिळविण्याच्या कल्पना या वृत्तपत्राच्या माध्यमातून मिळत आहेत.
या वृत्तपत्राच्या माध्यमातून जिल्हा आणि ग्रामीण भागातील अनेकांची प्रश्न, समस्या, गोरगरीबांची आवाज, सर्वसामान्य नागरिकांना हक्क मिळवून देण्याचे कार्य आपल्या पेपरच्या माध्यमातून होत आहे.खरोखरच हे वृत्तपत्र सर्वसामान्य नागरिकांसाठी एक बुलंद आवाज ठरला आहे.दैनिक चालू वार्ताचा डिजिटल स्वरूपातील अंक लवकरच सर्वदूर पसरला आहे.यासाठी पेठवडज सर्कलचे प्रतिनिधी बाजीराव गायकवाड व आपली संपूर्ण टीम हे उत्कृष्ट काम करीत आहेत. दैनिक चालू वार्ताचे मुख्य संपादक डि.एस.लोखंडे पाटील साहेब, कार्यकारी संपादक साहेब,सर्व वार्ताहार व संपूर्ण दैनिक चालू वार्ता टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.
वाचक:- अॅड.विनायकराव इरवंतराव कदम
मु.पो.कंधार जि.नांदेड
मो.7507237777