
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद प्रतिनिधी
मोहन आखाडे
औरंगाबाद :- कोरोना -ओमायक्रॉनची लाट नियंत्रणात आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील निर्बंध पुन्हा एकदा शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार आजपासून राज्यसरकारणी नवी नियमावली लागू केली आहे. नव्या नियमावलीनुसार राज्यात काय बंद, काय सुरु? पहा सविस्तर..
काय बंद, काय सुरु?
नॅशनल पार्क आणि जंगल सफारी आधीप्रमाणे नियमीत वेळवर सुरु होतील. पर्यटकांचं लसीकरण पूर्ण झालेलं असणं व मास्क बंधनकारक आहे. तसेच पर्यटकांना ऑनलाईन तिकिट बूक करावं लागेल. सर्व पर्यटनस्थळे नियमीत वेळेवर सुरु होतील. ऑनलाईन तिकिट खरेदी करावी लागेल. तसेच पर्यटनस्थळावर फिरायला जाणाऱ्याचं लसीकरण झालेलं असावं. लग्नसोहळे व अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी क्षमतेच्या 25% किंवा जास्तीत जास्त 200 लोकांच्या उपस्थितीत करण्याची परवानगी असेल
स्पा, ब्युटी पार्लर आणि सलूनमध्ये 50 टक्के उपस्थिती असावी. अंत्ययात्रामध्ये उपस्थितीवर मर्यादा ठेवण्यात आल्या नाहीत. कितीही लोक उपस्थित राहू शकतात. उपहारगृह, नाट्यगृह, चित्रपटगृह स्थानिक प्राधिकरणाने निर्धारित केलेल्या वेळेत 50 टक्के क्षमतेनं. अम्युझमेंट पार्क, थिमपार्क, जलतरण तलाव, वॉटर पार्क 50 टक्के क्षमतेनं सुरु होतील. दरम्यान, हॉटेल, रेस्टॉरंट आणि नाट्यगृहांची वेळ स्थानिक प्रशासन ठरवणार.