दैनिक चालु वार्ता
अमरावती प्रतिनिधी
श्रीकांत नाथे
अमरावती:- येत्या 19 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी अंजनगाव सुर्जी शहर व तालुक्यात एक दिवसाचा *”ड्राय डे” म्हणून दारूचे प्रतिष्ठाने बंद ठेवण्यासाठी मंगळवार दि. ८ फेब्रुवारी रोजी अंजनगाव सुर्जी युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. सविस्तर माहिती अशी की, महाराष्ट्र हा थोर पुरुष,राष्ट्रसंत, यांची जन्मभूमी व कर्मभूमी असलेला प्रदेश असून राष्ट्रसंतांच्या किंवा थोर पुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी निमित्त महाराष्ट्र राज्यात एक दिवस *”ड्राय डे”* पाळुन दारूचे प्रतिष्ठाने बंद ठेवावी.
तसेच येत्या १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दिनी अंजनगाव सुर्जी शहर व तालुक्यासह जिल्ह्यात एक दिवसाचा *”ड्राय डे”* पाळण्यात यावा व जयंती दिनानिमित्त दारूची प्रतिष्ठाने बंद ठेवावी.अशा मागणीचे निवेदन,युवा स्वाभिमान पार्टी चे अध्यक्ष तथा आमदार रवी राणा व खासदार नवनीत रवी राणा यांच्या आदेशानुसार व युवा स्वाभिमान युवा मोर्चा चे जिल्हा अध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात तसेच महेन्द्र भगत युवा स्वाभिमान पार्टी अंजनगाव सुर्जी यांच्या नेतृत्वात तहसीलदार अभिजीत जगताप यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना अंजनगाव सुर्जी युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
निवेदन देतेवेळी युवा स्वाभिमान पार्टीचे महेन्द्र भगत,पवन गुहे,किशोर बोरकर,गजानन भगत, श्रीकांत धुमाळे,गौरव जोशी, ऋषिकेश राऊत,अनंत मानकर,नंदु ठाकरे,संतोष चौधरी,बजरंग पातोंड, कुलदीप लोथे,संकेत धुमाळे उपस्थिति होते.