
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
राम पाटील क्षीरसागर
लोहा :- पत्रकारितेच्या क्षेत्रातील काम हे धाडसाचे असून हे करतांना पत्रकारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. परंतु एखाद्यावर टिका टिप्पणी करतांना सर्व पुराव्यांची खात्री करावी. एखाद्याचे आयुष्य विनाकारण उद्धवस्त होवून अन्याय होणार नाही. याचा विचारही करणे काळाची गरज आहे. लोहा तालुक्यातील मौजे बेरळी (खु.) येथे बाळासाहेब बुद्धे यांचा जन्म दि.१० फेब्रुवारी १९८८ रोजी एका सामान्य कुटुंबात एका खेड्यात झाला. शिक्षण पदवी पर्यंत झाले. लहानपणापासूनच त्यांना क्रिकेट खेळण्याचा व वाचनाचा छंद होता. त्यातूनच त्यांनी काही कालावधीनंतर छायाचित्रकार व्यवसाय करत असताना फोटोग्राफीच्या माध्यमातून पत्रकारितेशी नाळ जुळली.
वरचेवर प्रगतीचे पाऊल पुढे टाकत त्यांनी आजतागायत जवळपास दै.रिपब्लिकन गार्ड, दै.समता दर्पण, दै.महासागर, दै.प्रतिवीर दै.शब्दराज,दै.बळीराजा अशा विविध वर्तमानपत्रातून आपल्या लेखणीच्या माध्यमातून लोहा तालुक्यात एक वेगळी ओळख निर्माण केली.आजघडीला ते मागील दोन वर्षांपासून माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती आणि पोलीस मित्र फाऊंडेशन,लोहा तालुकाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. लोह्यासारख्या ग्रामीण भागात काम करत असताना तळागाळातील शेवटच्या माणसा पर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना न्याय मिळून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील असतात. प्रसंगी त्यांना अनेक अवहेलना अनेक दुःख वाट्याला आले. तरीही ते डगमगले नाहीत.
आपल्या लेखणीच्या माध्यमातून त्यांनी भल्याभल्यांना घाम फोडला. हे केवळ ते आपल्या आली. बुद्धीच्या जोरावर निर्भिडतेवर एकएक पाऊल पुढे पुढे टाकत संघर्षात आपला प्रवास सुरूच आहे.
ते आणखी जमिनीवरच आहेत. अगदी तनमन प्रसंगी धनानी ही प्रामाणिकपणाने आपलं कार्य पार पाडत असतात.त्यांनी आत्तापर्यंत दहा वेळा रक्तदान केले आहे.व तसेच देहदान अवयवदान नेत्रदान ही केले आहे.ते स्वच्छता अभियान, वृक्षारोपण करण्यासाठी नेहमीच सहभाग घेतात. निर्भीड, व्यासंगी, शांत, संयमी प्रसंगी परखड वाणी असणाऱ्या पत्रकार बाळासाहेब बुध्दे यांची एक दर्जेदार व अग्रगण्य आपल्या वाणीने नावलौकिक असणाऱ्या बहुआयामी आणि निर्भीड पणे लेखनातून लोहा तालुक्यातील अनेक गावातील अनेक ज्वलंत प्रश्न ऐरणीवर आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
समाजातील सर्वसामान्य शेतकरी, गोरगरीब, युवकांचा आदर्श म्हणून त्यांच्या कार्याची वेगळीच ओळख आहे. याचीच दखल घेऊन त्यांची माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती आणि पोलीस मित्र फाऊंडेशन, लोहा तालुकाध्यक्षपदी एकमताने दुस-दां बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सामाजिक व आंबेडकरी चळवळीत सहभागी राहुन भारतीय संविधान मूल्यांची अस्मितेची अभिमान बाळगणारा व महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध, महात्मा बसवेश्वर, शिवछत्रपती, म. फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज,पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, महाराजा यशवंतराव होळकर, आण्णा भाऊ साठे, आणि तमाम महामानवांचे विचार आणि कार्य लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी धडपडणारे एक तरुण तडफदार, अभ्यासू आणि यशस्वी वाटचाल अखंडपणे चालविणारे सारखीच एक तळमळ नेहमीच असते की वर्षानुवर्षे प्रवाहापासून दुरावलेल्या सामान्यातल्या सामान्य माणसाला प्रवाहात आणायचे.
त्यांना प्रवाहात आणण्यासाठीची त्यांची घडपड, जातीपातीच्या पलीकडे जाऊन उभं केलेलं संपूर्ण त्यांच काम उल्लेखनीय आहे. बाळासाहेब बुध्दे यांनी आपल्या लेखनातून ह्या सामाजिक कार्याचा व आंबेडकरी विचार चळवळीतील आलेख असाच वाढत जावो. आणि दिनदुबळ्याच्या जनकल्याणासाठीचा आणि पीडित शोषित वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठीचा आपला लढा असाच चालू राहो.उर्वरित आयुष्यासाठी व भविष्यासाठी आपणास आज जन्मदिनानिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा.