
दैनिक चालु वार्ता
कोरपना प्रतिनिधी
प्रदिप मडावी
कोरपना तालूका :- अक्षर साहित्य कला प्रतिष्ठान च्या वतीने दरवर्षी साहित्यनिर्मितीसाठी पुरस्कार देण्यात येते. सन २०२१ अक्षर वाडमय पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले. उत्कृष्ट काव्यसंग्रह लेखनाचा पुरस्कार “बिन चेहर्याचे कभिन्न तुकडे” लेखक अक्षय शिंपी मुंबई यांना घोषित करण्यात आला. कथासंग्रहासाठी “परतीचा प्रवास” लेखक राजेंद्र भोसले सोलापूर यांना, डॉ स्मिता निखिल दातार मुंबई लिखित “चौकोनाचा पाचवां कोन” या कादंबरीला उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार देण्यात आला ,तर इतर गद्य लेखनाचा लेखक रवींद्र जवादे मूर्तिजापूर यांच्या “गायी गेल्या राना” या साहित्यकृतीला पुरस्कार देण्यात आला आहे. १५००रु रोख स्मृतिचिन्ह, मानवस्त्र व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
अक्षर साहित्य कला प्रतिष्ठानचे अध्यक्ष रत्नाकर चटप यांनी नुकतिच राजुरा येथे सदर पुरस्काराची घोषणा केली,अशी माहिती पुरस्कार संयोजक चंदु झुरमुरे यांनी दिली. अक्षर साहित्य कला प्रतिष्ठानचे डॉ.किशोर कवठे मनोज बोबडे अविनाश पोईनकर, एड.दीपक चटप,राजेश देवाळकर, राम रोगे,उमेश पारखी,प्रवीण तूरानकर, प्रकाश काळे आधी पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी परिश्रम घेत आहे.गेल्या दहा वर्षांपासून अक्षर साहित्य कला प्रतिष्ठान सामाजिक,साहित्य,कला, शैक्षणिक आदी क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रतिष्ठान पुरस्कार देत आहे.