.
दै चालु वार्ता प्रतिनिधि
मोहन आखाडेऔरंगाबाद
आज उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कॉलेज सुरु करण्याबाबत एक महत्त्वाची घोषणा केली असून त्याबद्दल काही नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
पहा काय आहे नियमावली*
राज्यातील कॉलेज ५०% पटसंख्या उपस्थितीत राहून सुरू केले जाणार – तसेच लसीचे दोन डोस पुर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच कॉलेज मध्ये प्रवेश मिळणार आहे.
यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं संपूर्ण लसीकरण होऊ शकलं नाही – अशा विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात येईल – तसेच अशा विद्यार्थ्यांसाठी कॉलेजकडून विशेष शिक्षणाची व्यवस्था करण्यात येईल
महत्वाचे म्हणजे ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे – अशा जिल्ह्यांसाठी वेगळी नियमावली असणार आहे.
कोरोनाची नियमावली पाळून वसतिगृह सुरु करण्यात येतील – कॉलेज मध्ये शिक्षक, शिक्षकेवर कर्मचारी यांचं संपूर्ण लसीकरण होणं महत्त्वाचं आहे.