
दैनिक चालु वार्ता
पालघर प्रतिनिधी
अनंता टोपले
मोखाडा तालुक्यातल्या हिरवे गावातला आदिवासी शेतकरी भागिरथ भुसारा यांची मोखाड्या तालुक्यात स्ट्रॉबेरीची पिकवण्याची भरारी*
मोखाडा :- जिल्ह्यातील जव्हार मोखाडा म्हटलं उभा राहतोय समस्यांचा भला मोठा डोंगर आदिवासींच्या पाचवीला पुजलेला विविध समस्या अद्यापही सुटलेल्या नाहीत हे भयाण वास्तव आजही कायम आहे परंतु अशाही परिस्थितीत या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी कृषी विभागाणे आपली कंबर कसली असून विविध नाविन्यपूर्ण यशस्वी प्रयोग अमलात आणत आहेत पारंपरिक भात शेती आणि नाचणी पिकाला बगल देत आता पालघर मधील जव्हार मोखाडा येथील शेतकरीही पर्यायी लागवडीकडे वळताना पाहायला मिळतोय .
पाचगणी महाबळेश्वर सारख्या थंड हवेच्या ठिकाणी उत्पादित होणाऱ्या स्ट्रॉबेरीची लागवड आता जव्हार मोखाडा भागातील शेतकऱ्यांकडून केली जाते यामुळे येथील शेतकऱ्यांची आर्थिक घडी मजबूत होण्यास मदत होणार आहे. मोखाडा तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी भगीरथ भुसारा पूर्वी पारंपरिक शेती करायचे मात्र या उत्पादनातून फक्त प्राथमिक गरजा भागाच्या म्हणून त्यांना सतत रोजगारासाठी स्थलांतरित व्हावे लागायचं मात्र त्यानंतर त्यांनी चार वर्षांपूर्वी कृषी विभागाच्या योजना प्राप्त करण्याकडे भर दिला.
पहिल्यांदा भुसारा यांनी मोगरा लागवड करून उत्पादन घ्यायला सुरुवात केली मात्र गेल्या वर्षापासून कृषी विभागाच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या अभ्यास सहलीच्या माध्यमातून स्ट्रॉबेरी लागवडीचे धडे घेतले आणि हाच प्रयोग त्यांनी आपल्या साडेपाच एकर असलेल्या माळरान शेतीत मोगरा लागवडीबरोबरच स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग केला सध्याच्या घडीला त्यांना या स्ट्रॉबेरी उतदनातून चांगला फायदा होत असून स्ट्रॉबेरी असून चांगली बाजारपेठ प्राप्त झाली या उत्पादनातून भुसारा यांना एका सीझनमध्ये खर्च वजा जाता साधारणता अडीच लाखाचा नफा होईल अशी आशा आहे.
जव्हार मोखाडा येथील आदिवासी समाजातील बहुतेक नागरिक हे पावसाळ्यानंतर रोजगारासाठी स्थलांतरण करतात हाताला काम नसल्याने येथील गावच्या गाव रोजगारासाठी शहरांकडे जात असून हेच स्थलांतरण रोखण्यासाठी कृषी विभागाकडून अनोखा उपक्रम राबविण्यात आला आहे महाबळेश्वर सारख्या थंड हवेच्या ठिकाणी मिळणारे स्ट्रॉबेरी आता जव्हार मोखाड्यात ही सहज उपलब्ध होते जव्हार आणि मोखाडा येथील काही शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली असून यामुळे येथील रोजगार वाढून स्थलांतरण संपुष्टात येण्यास मदत होईल अशी आशा येथील शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येते.
जव्हार आणि मोखाडा ची ओळख हे मिनी महाबळेश्वर अशी असून याठिकाणी वातावरण हे जानेवारीच्या अखेरपर्यंत अतिथंड असतं येथील स्थलांतरण आणि बेरोजगारी लक्षात घेऊन कृषी विभागाकडून या शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीच्या लागवडीचे प्रशिक्षण देऊन प्रत्येकी शेतकऱ्याला स्ट्रॉबेरीची रोपे देण्यात आली आहेत प्रायोगिक तत्त्वावर ही लागवड करण्यात आली असून इतर ठिकाणी रासायनिक खतांचा वापर जास्त होतो मात्र या भागातील मातीत अशी आहे की या भागात सेंद्रिय पद्धती प्रमाणे हे उत्पादन घेतले जात.
त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना उत्पन्नही चांगले मिळाले सध्या ही लागवड व्यावसायिक दृष्टीने केली जाणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. तर गेल्या दोन वर्षापासून जव्हार मोखाडा वाडा विक्रमगड या भागात कृषी विभागाकडून योजनांची चांगली अंमलबजावणी होत आहे त्यामुळे शेतीतील हे प्रयोग यशस्वी होत आहेत यामुळे सध्या स्थलांतराच्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली असून यामुळे या भागातील शिक्षण आरोग्य कुपोषण या समस्या ही मिटण्यास मदत होईल त्यामुळे या भागातील नागरिकांनी आपल्या शेतीकडे जातीने लक्ष देऊन योजनांचा लाभ घ्यावा.
आपल्या शेतीमधून उत्पादन घेऊन आपली प्रगती करावी असं आवाहन आमदार सुनील भुसारा यांनी केल आहे. जव्हार आणि मोखाडा भागातील स्थलांतरण रोखण्यास शासनाला मागील अनेक वर्षांपासून अपयश येताना पाहायला मिळत आहे मात्र आता या शेतकऱ्यांना आपल्या शेतीतच रोजगार उपलब्ध होणार असल्याने हे स्थलांतरण रोखून येथील बेरोजगारी ही संपुष्टात येईल असं काहीसं चित्र दिसतं