
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
कोल्हापूर :- माणसापेक्षा जंगली प्राण्यांची किंमत जास्त आहे. विजेचा धक्का लागून हत्ती मारला गेला तर नुकसान भरपाई २५ कोटीची वसुली शेतकऱ्याकडून केली जाते. शेतकऱ्याला विजेचा धक्का बसून मृत्युमुखी झाला तर केवळ २ लाख रूपये नुकसान भरपाई दिली जाते. तीन कुबड्याच्या सरकारने शेतकऱ्याला अस्थिर केले आहे. राज्यात धरणे बांधली गेली, जमिनी शेतकऱ्याच्या घेतल्या गेल्या.
पुर्नवसन देखील शेतकऱ्याच्या जमिनीवर केला गेला. सरकारमधील मंत्र्यांना सत्तेची मस्ती आली आहे. मस्तीत व सत्तेच्या धुंदीत जनता तुम्हाला रस्त्यावर आणेल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला. शेतीला सलग १० तास दिवसा वीज मिळावी या मागणीसाठी दुसऱ्या दिवशीही महावितरणच्या कार्यालयासमोर ठिय्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू आहे. यावेळी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या पुतळ्याचे दहन राजू शेट्टींनी केले.
यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, मंत्रालयाच्या दालनांची वीज अहोरात्र सुरू असते. मंत्रालयात देखील दारूच्या बाटल्या सापडू लागल्या आहेत. तिथेही हेच धंदे सुरू असतात काय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मंत्र्याची दालने दिवसाही विजेने चमकत असतात. सरकारच्या तिजोरीतून पैसा उचलून विजेची बिले भागवली जातात.