दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई, 5 मार्च :- नागराज मंजुळे यांचा झुंड हा बहुप्रतिक्षित चित्रपट काल 4 मार्च रोजी प्रदर्शित झाला. झुंड चित्रपट पाहून अनेक बॉलिवूड कलाकार आणि दिग्दर्शकांनी नागराज मंजुळे यांचं कौतुक केलं आहे. आमिर खानने देखील नागराज मंजुळे यांचे कौतुक केले आहे. या सिनेमाला प्रेक्षकांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता अभिनेता सिद्धार्थ जाधव याने देखील नागराज मंजुळे यांच्या झुंड सिनेमाचे कौतुक केलं आहे. सिद्धार्थ जाधवने पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “तुम्ही आमचं अस्तित्व नाकारूच शकत नाही…”नागराज मंजुळे भावा…
अप्रतिम हा शब्द फक्त नावाला आहे.. त्याचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल तर “झुंड” पाहयलाच हवा…स्वप्न प्रत्येकाची असतात.. पण ती पूर्ण करण्याची धमक “झुंड ” मध्ये होती, आहे, आणि कायम राहणार.. हे तू पुन्हा एकदा सिध्द केलस…
अभिमान वाटतो तुझा…”अपून कि बस्ती गटर मे है… पर तुम्हारे मन मे गंद है”…. या ओळी मनातून जातच नाहीत… अजय अतुल दादा…कलाकारांच्या कामाबद्दल मी काय बोलणार…”बच्चों से लेकर बच्चन तक”…. सगळेच वरचा class…जे जगणं आहे तेच नागराज ने खरंखरं मांडलय….माणसाच्या माणूसकीचा प्रवास… झुंड…
नक्की बघा नाही.. पहायलाच हवा… आपला सिद्धू म्हणत सिद्धार्थन नागर मंजुळेचे कौतुक केलं आहे. इतका राग होता तर मुख्य भूमिकेत अमिताभ कशाला? प्रसिद्ध लेखिकेचा सवाल झुंड चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबतच आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमाचं बॉलिवूडसह मराठी, दाक्षिणात्य कलाकरांनी देखील कौतुक केलं आहे. या सिनेमाचं कौतुक होत असताना प्रसिद्ध लेखिका शैफाली वैद्य यांनी या सिनेमाबद्दल एक पोस्ट लिहिली आहे.
सध्या शैफाली वैद्य यांची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे की, इतका राग होता उच्च वर्णीय प्रस्थापितांवर तर मग मुख्य भूमिकेत अमिताभ कशाला? असा सवाल शेफाली वैद्य यांनी केला आहे. त्यांच्या या सवालावर अनेकांनी विरोध दर्शवत नागराज मंजुळे यांचं कौतुक केलं आहे.