दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
विश्वास खांडेकर
मनात जिद्द असेल आणि मेहनत ची तयारी असेल तर तुम्ही ध्येयापर्यंत पोहोचू शकता, सिद्धेश्वर भोरे उपविभागीय अधिकारी नांदेड
नांदेड :- (डॉ.प्रवीणकुमार सेलूकर) नांदेड येथे तोटेवाड फिजिकल अकॅडमी नवा मोंढा नांदेड च्या वतीने पोलीस भरती 2021-22 मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न झाला, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर विठ्ठलसिंग परिहार क्रीडा डायरेक्टर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सिद्धेश्वर भोरे उपविभागीय पोलिस अधिकारी इतवारा पोलिस स्टेशन नांदेड, तसेच गोविंद हंबर्डे, सुरक्षा अधिकारी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड ,शिंदे, खांडेकर विश्वास आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा व गुणवंत विद्यार्थी वानोळे शिवकन्या सखाराम, सुर्यवंशी सुशीला आनंदा, ढगे श्रीकांत प्रल्हाद, अवेस अब्दुल करीम खान, पवार निरंजन मारुती ,शिवहार आतम कल्याणकर, माधव अशोकराव कांजाळकर ,सचिन जनार्धन खंडागळे, अंकुश माणिक गुहाडे आदी विद्यार्थीचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाची प्रस्तावना अकॅडमीचे संचालक संभाजी तोटेवाड यांनी केली यावेळी बोलताना ते म्हणाले की गेल्या दहा वर्षापासून विद्यार्थ्यासाठी पोलीस दलातील भरतीसाठी तसेच सैन्य भरतीसाठी शारीरिक प्रशिक्षण देत आहे.
आज पर्यंत दोनशेच्यावर विद्यार्थी वेगवेगळ्या विभागात कार्यरत आहेत. ॲकॅडमीमध्ये प्रवेश मोजक्याच होतकरू विद्यार्थ्यांना दिला जातो जेणेकरून त्यांना योग्य प्रशिक्षण देता येईल. जे विद्यार्थी केवळ करमणूक म्हणून प्रवेश घेतात ते जास्त दिवस टिकत नाहीत. कोणत्याही पदावर जाण्यासाठी आधी घाम गाळावा लागतो त्याशिवाय फळ मिळत नाही असेही ते यावेळी बोलताना म्हणाले, या समारंभात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर भोरे म्हणाले की प्रत्येक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करताना आपल्यापुढे वेगवेगळे ध्येय ठेवतो.
विद्यार्थीनी जोपर्यंत ध्येय साध्य होत नाही पर्यंत शांत बसू नये, पोटाला चिमटा घेऊन आई-वडील तुम्हाला शिकवत असतात त्यांची अपेक्षा असते की मुलाला नोकरी लागल्यावर तो कुटुंबाला हातभार लावेल. त्यामुळे सुरुवातीला जेथे निवड होईल ती नोकरी स्वीकारा त्यावर समाधान नसेल तर पुढच्या परीक्षेची तयारी करा व आपल्या ध्येया पर्यंत मजल मारा ,जर तुमच्या जिद्द असेल आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर तुम्ही ध्येय साध्य करू शकता. समाधान मानले तर प्रगती खुंटते त्यामुळे समाधान न मानता पुढील टप्पा गाठावा असेही बोलताना उपविभाग विभागीय अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वरभोरे म्हणाले.
अध्यक्ष भाषणात डॉक्टर विठ्ठल सिंग परिहार यांनी म्हटले की माझे आयुष्य संपूर्णता विद्यार्थ्यांमध्ये गेल्या असून विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी मला माहीत असतात जीवनात यश अपयश येत असते मी 1987 पासून वेगवेगळ्या पदावर काम करत आलेला आहे. काही ठिकाणी यश मिळाले तर काही ठिकाणी अपयश पदरात पडले त्यामुळे विद्यार्थ्यांनी खचून न जाता ध्येय गाठण्याचा प्रयत्न करावा. कोणत्याही क्षेत्रातील यश प्राप्त करताना शॉर्टकट मार्गाचा अवलंब करू नये फक्त संयम बाळगा तयारी करा, यश आज ना उद्या नक्की मिळेल याची खात्री असते असेही ते बोलताना म्हणाले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम बी मोरे तर आभार प्रदर्शन निरंजन पवार यांनी मानले.