दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मी कदाचीत तिसऱ्या किंवा चौथ्यावर्गात शिकत होतो. आश्रम शाळेत सकाळ संध्याकाळ प्रार्थाना म्हटल्याशिवाय जेवन देत नसत. त्यामुळे कदाचीत शाळेत न येणारे पण जेवायाला येणारे सर्वजण प्रार्थनेला हजर असत. सकाळी “खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे” व संध्याकाळी “पसायदान” व्हायचे. १९७१ साली बहुधा डिसेंबर महिना असावा. प्रार्थना झाली की आम्ही सर्व विद्यार्थी जोर जोरात भारत माता की जय. भारताचा विजय असो. पाकिस्तान मुर्दाबाद. आशा घोषणा आमच्या कडून दिल्या जायच्या. त्या काळी दोन देशात युद्ध होतं ही कल्पना वयाच्या मानाने आम्हाला न समजणारी होती.
सेवादास विद्यालय वसंतनगर येथे चित्रकलेचे एक शिक्षक होते. ते चित्र खुप छान काढायचे. अक्षरही खूप भारदस्त व भारी छान होते. ते दररोज सकाळी बोर्डावर ठळक अक्षरात लिहायचे भारताने आज पाकिस्तानचे इतके इतके विमान पाडले. येवढे रणगाडे नष्ट केले. इतके सैनिक ठार केले. हे वाचून आम्ही जोरजोरात घोषणाबाजी करायचो. भारत पाकिस्तानला आता ठार मारून टाकते अशी चर्चा करायचो. युद्धाच्या शेवटपर्यंत भारताने पाकिस्तानच्या किमान हजार विमान नष्ट केले होते तर लाखात सैनिक मारले होते. पण जेव्हा मी कॉलेजला गेलो. भारत पाकिस्तान युद्धाचा अभ्यास केलो तेव्हा कळाले, की भारताने पाकिस्तानचे जेवढी विमाने युद्धात नष्ट केली असे सांगितले होते.
तेवढी विमाने दोन्ही देशाची मिळून एकत्र केल्यानंतरही भारत-पाकिस्तानकडे तेवढी विमाने नव्हती. मग असे का सांगायचे? याचे कारण देशातील नागारीकांचे धैर्य खच्चीकरण होवू नये. नागरिकांत भय पसरू नये. समोरच्या शत्रु पक्षाचे खच्चीकरण व्हावे. त्याच्या धैर्याचं पतन व्हावे यासाठी सर्व चालले असते हे नंतर कळाले. युद्धात लबाडी व लबाडाला माफी असते. भारत पाकिस्तान युद्ध…… भारताने फक्त चौदा दिवसात संपवलं. चौदा दिवसात भारताने पाकिस्तानची नाक कापली. पाकिस्तानचे जवळपास ९० हजार सैनिक भारताला शरण आले. पण त्या पूर्वी एक भयान नाट्य घडले. पाकिस्तानच्या मदतीला महाशक्ती अमेरिका व त्याचा मित्रराष्ट्र ब्रिटन हे दोघे धाऊन आले.
एका राष्ट्राचे आरमारिक दल बंगालच्या खाडी कडे निघाले तर दुसरे आरबी समुद्राच्या दिशेने. त्यावेळच्या कणखर पोलादी नेतृत्व असलेल्या प्रधानमंत्री श्रीमती इंदिराजी यांनी पहाटे तीनच्या नंतर सोव्हियेट युनियनशी चर्चा केली. अमेरिकेची कपट निती सांगितली. रशिया हा भारताचा पूर्वीपासूनचा घनिष्ठ मित्र होता व आज ही आहे. तो आपल्या मदतीला धावून आला. अमेरिका ब्रिटन देशाचे आरमार भारताच्या समुद्रात येण्यापूर्वीच रशियाचे आरमार येथे दाखल झाले होते. रशियाचे आरमार पाहून ते दोन्ही देश टरकले व आल्या पावली परत फिरले.
आज रशिया व युक्रेनचं युदध चालू आहे. अमेरिका व त्याचे मित्रराष्ट्र नाटोतील देश रशियास दोषी ठरवत आहेत. युद्धाची धमकी देत आहेत. रशियाला हल्लेखोर राष्ट्र ठरवत आहेत. पण अमेरिकाला खरचं नाटो संघटनेची गरज आहे का? जर अमेरिका स्वतःला महाशक्ती समजते तर नाटो राष्ट्रांची मदत का घेते? नाटोच्या माध्यमातून सर्व जगावर हुकूमशाही गाजविण्याची अमेरिकेची खुमखुमी आहे. त्यात स्वतःच स्वार्थ लपलेले आहे. अमेरिका व चीन हे राष्ट्र नेहमीच कपटीपणाने वागत आलेले आहेत. त्याच्याशी मैत्री करणारा देश नंतर खोल गर्ततेत गेलेले आहेत.
अमेरिका महाशक्ती म्हणून मिरवतो; पण तो देश डरपोक आहे भित्रा आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे तो चीन इतकाच विश्वासघातकी आहे. अमेरिकेला मैत्रिपेक्षा स्वतःचं स्वार्थ महत्वाचं आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी तो नेहमीच दोन देशात भांडण लावून स्वतःची पोळी भाजून घेतो. जगाच्या दृष्टीकोनातून पोलीसही तोच व चोर ही तोच. भारत युद्धा पेक्षा बुद्धाला महत्व देतो. विश्व शांतीला महत्व देतो. मित्र देशांशी कधीही दगाफटका करत नाही. पण सध्या जे रशिया युक्रेन युद्ध चालू आहे यात भारतीय इलेक्ट्रॉनिक मिडीया रशियाला बदनाम करत आहे. रशियास युद्धखोर राष्ट्र ठरवत आहेत. युक्रेन कोणे एकेकाळी सोवियेत युनियनाचा भाग होता.
आजही तेथे रशियन वंशाचे लोक राहतात त्यामुळे रशिया हल्ला करताना तेथील सामन्य नागरिकांचा विचार करून विचारपूर्वक नियोजनबद्ध हल्ला करत आहे. मनुष्य हानी होवू नये यांची काळजी घेत आहे. त्यासाठी रशियाला काळजीपूर्वक हल्ला करावा लागत आहे. भारतीय मिडिया रशियाला युक्रेन जिंकता येत नाही. असी टिमकी वाजवत आहेत. नाटोनी युक्रेनची बाजू का घेत नाही असा सवाल ही विचारत आहेत. विस दिवसापासून युद्ध धुमसत आहे. दोन देशातल्या युद्धाला भारतीय मिडीया ‘महायुद्ध’ असे संबोधत आहेत. जणूकाही घरातच युद्ध चालू आहे. हे सगळे तेथे थांबून पाहात आहेत असं युद्धाचं वर्णन करत आहे.
युक्रेन स्वतःच्या देशासाठी वाटाघाटी करणाऱ्या व्यक्तीस गोळ्या घालून ठार मारतो मग यांना सैन्य तळावर, गोपनिय ठिकाणी कसा जावू देईल? युद्धात गोबल्स निती वापरली जाते. गोबल्स कोण होता? गोबल्स हा हिटलरचा प्रचार मंत्री होता. तो हिटलर पेक्षाही क्रुर होता. त्याची प्रचार करण्याची एक रित होती. ती रीत किंवा पद्धत अतिशय सोपी होती. सर्वच मानसं विद्वान नसतात. सर्वसामान्य नागरिकांना समजेल या भाषेत तो प्रचार करायचा. एकच लबाड गोष्ट आपण शंभर वेळा किंवा वारंवार सांगितली की ती गोष्ट सर्वांना सत्य वाटायला लागते. असे त्याचे म्हणणे होते.
आजही हिटलरवादी याच तंत्राचा उपयोग करत आहेत. भारतीय मीडिया सुद्धा या तंत्राचा अतिशय खुबीने वापर करत आहे.
युक्रेन आपला मित्र राष्ट्र नाही. तो देश नेहमीच भारत विरोधी भुमिका घेतलेली आहे. युनोत ही भारत विरोधी भुमिका वटवलेली आहे. या विरुद्ध रशिया प्रत्येक संकट समयी भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभा टाकलेला आहे. भारताला प्रत्येक वेळी मदत केलेली आहे. रशिया भारतासोबत कधीच गद्दारी केलेली नाही. आजही सामरिक साहित्य रशिया आपणास पुरवतो. भारतीय इलेक्ट्रॉनिक मिडीया उगीच भारतीय लोकाच्या मनात रशिया युद्धखोर राष्ट्र आहे अशी प्रतिमा निर्माण करू पहात आहे. युक्रेनला सहानुभूती दाखवत आहेत.
आपणास दोन मित्राची गोष्ट माहित असेल. भोला आणि काला हे दोघे घनिष्ट मित्र होते. एके दिवशी ते प्रवासाला निघाले त्याकाळी प्रवासाच्या साधनांची सोय नव्हती. फक्त पाऊल वाटेने पायी पायी जात. ते दोघे निघाले. छानपैकी गप्पा मारत चालले होते. आपण कसे जिवलग मित्र आहोत ते एकमेकांना सांगात होते. कालू म्हणाला भोला, “कितीही मोठं संकट आलं तर आपण एकमेकाला साथ द्यायची. जीव गेलंतर बेहतर पण साथ सोडायची नाही.” ते दोघे चालत राहीले चालत राहीले. पुढे अचानक घटनदाट जंगल लागलं. पाऊल रस्त्याच्या दोन्ही बाजूने घनदाट वृक्षवल्ली होती. दोघंही घाबरले.
पण संकटात मदत करण्याची शपथ घेतलेली होती म्हणून दोघेही हिम्मतीने चालत होते. नियती काळ वेळ सांगून येत नाही. नियती फार वाईट असते. अरे देवा यांचं नशीबच फुटकं. पुढून अचानक एक धिप्पाड अंगाचा अस्वल येत होता. अस्वलाला पाहून दोघंही घाबरले. भोला शरीराने कमकुवत होता. भोळा होता. मित्रावर विश्वास ठेवणारा होता. जसं अस्वल जवळ आलं तसं कालू पटकण झाडावर चढून बसला. भोलाला झाडावर चढता आले नाही. अस्वल गतीने त्यांच्याकडे येत होता. भोलाला युक्ती सुचिली तो झाडाखाली मेल्यागत आडवा पडला. हलचाल नाही. आगदी शांत पडून राहीला. अस्वल आला. भोलाच्या आजूबाजूने फेरी मारत त्याला थोडंसं हुंगलं व तेथून निघून गेले.
जाताना अस्वल भोलाच्या कानाजवळ हुंगलं होतं. अस्वल गेलं तसं काला झाडावरून खाली उतरलं व भोलाला म्हणाला, “भोला अस्वलाने तुझ्या कानात काय सांगितले” यावर भोला म्हणाला, “विश्वास घातकी कपटी मित्रावर कधीही भरोसा ठेवू नको.” हे ऐकून काला शरमिंदा झाला.अमेरिकाही असाच देश आहे. मित्र म्हणून ढोंग करायचा. त्याला इतर देशाशी कुरापत काढायला लावायची. मग मागे हाटायच. युक्रेनची ही हालत करण्यास अमेरिका व नाटो राष्ट्रच जबाबदार आहेत. त्यांना स्वतःची शस्त्रास्त्र विकायची व भक्कम पैसा कमवायचं आहे. रशियाला कमकुवत करून त्यांना जगावर अधिराज्य गाजवायचं आहे.
अमेरिका हा देश डरपोक भित्रा आहे तेवढाच कपटी कारस्थानी आहे. विश्वास घातकी आहे. व्हियेतनाम सारख्या लहानशा गरिब देशाने या देशाला पराभूत केले आहे. आफगाणिस्तान मधून अमेरिकाला काढता पाय घ्यावा लागाला आहे. यावरून अमेरिका कशी आहे याचा विचार करावा. अमेरिका वरील गोष्टीतल्या कालू सारखा आहे. कामापुरता वापरून घेण्याचं तंत्र अमेरिकेला माहित आहे. “गरज सरो, वैद्य मरो” हे अमेरिकेच धोरण राहिलेलं आहे.
भारताने रशिया युक्रेन युद्धात जरूर मध्यस्थाची भूमिका बजवावी. जगाला तिसऱ्या महायुद्धापासून वाचवण्याचे काम भारत करू शकतो. ही क्षमता आज निश्चित भारताकडे आहे. भारत युद्धापेक्षा बुद्ध श्रेष्ठ हे पटवून देवू शकतो.
त्याच वेळी रशिया व आपली दोस्ती कायम रहावी याची काळजी भारताने घ्यावी. युद्ध नको बुद्ध हवा. अणुबॉम्ब नको विकास हवा. “विश्व हेची माझे घर” हे भारताने जगाला पटवून देण्याची हीच खरी वेळ आहे. भारत खरचं शांती प्रिय बुद्धांचा देश आहे हे ही पटवून देण्याची हीच वेळ आहे. भारत यात यशस्वी होईल अशी अपेक्षा करू या.
©राठोड मोतीराम रुपसिंग
नांदेड