
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
नागपूर :- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयने महाविकास आघाडी सरकारला मोठा झटका दिला आहे. परमबीर सिंहांच्या सर्व प्रकरणाचा तपास सीबीआयकडे (CBI) देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. परमबीर सिंहांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये केलेल्या याचिकेप्रमाणे त्यांना कारवाईपासून संरक्षण देखील मिळाले होते. याचबरोबर त्यांनी आपल्यावर सर्व प्रकरणांचा तपास सीबीआयकडे सोपवला जावा अशी मागणी देखील सर्वोच्च न्यायलयाकडे केली होती.
यापार्श्वभूमीवर शिनसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. हा राज्य सरकारला धक्का नाही. तर कोणाला तरी दिलासा देण्याचा आणखी एक प्रयत्न असल्याचा राऊत म्हणाले. महाराष्ट्र सरकारकडून सिंह यांच्यावर दाखल गुन्ह्यांचा तपास मुंबई पोलीस आणि सीआयडीकडून (CID) सुरु होता. मात्र, आता महाराष्ट्र सरकारला हा मोठा झटका बसणार आहे. कारण, या सर्व प्रकरणांचा तपास आता सीबीआयकडे वर्ग करण्यात येणार आहे. यामुळे सीबीआयकडून (CBI) या सर्व प्रकरणांचा तपास कसा केला जातो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.