दैनिक चालु वार्ता
कंधार प्रतिनिधी
माधव गोटमवाड
Kandhar:- कंधार तालुक्यातील घागरदरा ग्रा.प. अर्तगत असलेल्या पट्टाचा तांडा येथे आत्तापासुनच पाणी टंचाईला सामारे जावे लागत आहे. ग्रा.प.च्या दुर्लक्षपणामुळे येथे पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.असे येथील तांडावासीयानी सांगितले आमच्या पाचवीला सटवीने पुंजले का साहेब आम्ही पोट भरण्यासाठी विटभटी ,उसतोडीच्या कामासाठी आम्ही सहासहा महीणे गाव सोडुन जातो व परत आल्यावर तरी आमच्या नशीबी पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येते. आम्ही काही पापकरुण आलोय काय हो साहेब काही करा पण आम्हाला पाणी द्या हो असा टाहो येथील दिगंबर राठोड यांनी केला.
आम्ही कुठुन तरी घागरभर पाणी आणुन आमची तहाण भागवतो पण आमचे जनावरे आम्हि कुठे घेउन जावे आमच्या लहाण लहाण मुलाला कडेला घेउन पाण्या साठी भटकंती करावी लागती तेही मिळेल तेथुन पाणी आनावे लागते ग्रा.प.ने यासाठी काही तरी करावे शिवलिला पवार ग्रामसेवक केद्रे यांना पाणी टंचाई विषयी विचारण्यासाठी भ्रमणध्वनी द्वारे विचारणा करण्यासाठी फोन केला.पण त्यांनी फोन रिसिव्ह केला नाही. येथीलच विद्यमान सदस्य यांनी सांगितले की आज जवळपास दोन महीणे झाल.
येथे पाणी टंचाई आहे.व येथील ग्रामसेवक एकएक महीणा गावाकडे येत नाही नांदेडहुनच कारभार पहातात असे सांगितले . सरपंच घुगे यांना पाणी टंचाई विषयी विचारले असता पाणीपुरवठा करनार्या विहरीला भरपुर पाणी आहे त्या विहरीवरुन त्या तांड्यासाठी नविन पाईपलाईनही केली आहे पण लाईट साथ देत नाही असे सांगितले मी चार दिवसापुर्वीच तांडावर जाउन आलो असे त्यांनी सांगितले.