दैनिक चालु वार्ता
मुखेड प्रतिनिधी
संघरक्षित गायकवाड
मुखेड :- वन विभागाचा तिन तालुक्याचा कारभार पाहणारे वनपरिक्षेत्र अधिकारी तब्बल एक एक महिना कार्यालयाकडे फिरकत नसल्याने कामाचे तर तिन तेरा वाजतच असून कार्यालयात आलेल्या तक्रारीचाही निपटारा होत नसल्याने कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांना तक्रादरांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याने ते कर्मचारीही वैतागले आहेत. वनपरिक्षेत्र अधिकारी हिवरे यांच्या जाणूनबुजून होणाऱ्या दुर्लक्षामुळे तीनही तालुक्यातील वनसंपदा धोक्यात आली आहे.
वनसंपदेच काहीही होवो पण घरी बसून पगारीबरोबरच लाकूड चोराकडून मोठ्या प्रमाणात अर्थिक मदत मिळत असल्याने ते मालामाल होत आहेत. नायगाव तालुक्यातील विविध आरा मशीन कारखानदार यांना मोठ्या प्रमाणात लाकूड पुरवण्यात येते ते पण भरदिवसा वन अधिकारी मात्र झोपेचे सोंग घेतात की अजून मलिद्यात मग्न असल्यामुळे आरामशीन दार कारखानदार यांच्याकडे लाकडाचा साठा मोठ्या प्रमाणात असून अधिकाऱ्याचे मात्र दुर्लक्ष वेळोवेळी तक्रार देऊन तक्रार करून सांगून पण कुठल्याच कारवाई होत नसल्यामुळे सामान्य जनतेतून फार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
नायगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात लाकूडतोड्या होत असल्यामुळे वाळवंट चे प्रमाण दिसू लागले आहे यात वन अधिकारी कर्मचारी वनपाल म्हणून बघत असल्यामुळे कुठल्याच प्रकारची कारवाई होत नाही तक्रार पत्र टेबलवरच कुठलीच कारवाई नाही असा नियम त्यांनी लागू केला आहे पत्र येतात बघतात टेबल च्या खाली दबवल्या जातात या अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणामुळे जनता त्रस्त झाली असून तक्रारदार तक्रार करून तर कुठल्याच प्रकारची चौकशी व कारवाई होत नसल्यामुळे अधिकारी सर्व मिलीभगत आहेत असे समजले जाते.
चौकशीच्या नावाखाली परस्पर भेट गाठी होताना असा प्रश्न जनतेतून बोलताना दिसून येत आहे पण चौकशी कारवाई मात्र शून्य या अधिकारी सर्व कर्मचारी सर्व मिलीभगत असल्यामुळे कारवाई होतच नाही असे जनतेतून बोलल्या जाते तर हा फार भविष्यकाळ फार मोठा प्रश्न असला तरी अधिकारी कुठल्याच प्रकारची चौकशी का करत नाही आणि फोन तर उचलतच नाहीत जनतेतून विचारल्याजात असल्यामुळे भविष्यकाळात वाळवंट व्हायला वेळ लागणार नाही असा पण प्रश्न निर्माण होत आहे. वन अधिकारी कार्यालयाकडे महिना महिना पिरकुन पण बगत नाहीत असे कर्मचाऱ्यांकडून बोलले जाते मग चौकशी कारवाई तर लांबच राहिली यावर नांदेड जिल्ह्याचे उप वनसंरक्षक अधिकारी लक्ष घालतील का असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.