दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
दि.24/3/2022 रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि प.ज.ने समाजकार्य महाविद्यालय अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थिनी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा संपन्न झाली. कार्यशाळेच्या विषय महिला आणि आरोग्य हा होता. उद्घाटन सत्रात उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणुन अनुरूपाताई भांडारकर उपस्थित होत्या . प्रमुख अतिथी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एस. पाटील, स्वयंसिद्धा कराटे प्रशिक्षक मा. सुनील करंदीकर, अमळनेर हे उपस्थितहोते. शाळेची सुरुवात स्वागत गीत तसेच प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
कार्यशाळेचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.अनिता खेडकर यांनी विद्यापीठस्तरीय कार्यशाळेच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला, व आजच्या या कार्यशाळेत विद्यार्थिनींना मार्गदर्शन काय मिळणार आहे, याचा उहापोह केला. युवतींसाठी ही कार्यशाळा अतिशय महत्त्वाचे आहे हे सांगितले. कार्यशाळेचे प्रमुख अतिथी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी एस पाटील यांनी विद्यार्थिनींनी कोणत्याही क्षणी स्वतःला कमी लेखू नये, इतिहासात महिलांनी गाजवलेले पराक्रम लक्षात ठेवून स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याचे आव्हान केले.
उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्ष माननीय अनु रूपाताई भांडारकर यांनी विद्यार्थिनींनी जिद्दीने शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे आवाहन केले. उद्घाटन कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. डॉ.अस्मिता सरवैया यांनी केले. कार्यशाळेसाठी पहिले सत्राचे मार्गदर्शक प्रा.डॉ. शाम सोनवणे, लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगाव, यांनी महिला आरोग्य आणि दैनंदिन जीवनात घ्यावयाची काळजी या विषयावर मार्गदर्शन परत करताना सांगितले की, आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला यांच्या आरोग्याची काही निर्देश दिलेले आहेत.
ज्या देशातील महिला आणि बालक आरोग्य सक्षम सुदृढ असेल त्या देशाची सामाजिक परिस्थिती सहज ओळखता येते, शिवाय दैनंदिन जीवनात आहार, शिक्षण, समाजव्यवस्था, कुटुंब व योगासने यांचे अत्यंत महत्त्व आहे असे मार्गदर्शन केले.दुसरे मार्गदर्शक प्रा डॉ. कांचन महाजन धरणगाव महाविद्यालय यांनी व्यक्तिमत्व विकासासाठी निरोगी जीवनाचे महत्व यात युतीने आपल्या मनातील भीती कमी करून आपले जीवन व व्यक्तिमत्व विकसित करावे या बाबत मार्गदर्शन केले.
तिसरे मार्गदर्शन डॉ. लीना चौधरी, अथर्व क्लिनिक अमळनेर यांनी महिलांसाठी पंचकर्म व आयुर्वेदिक उपचार या विषयावर युवतींच्या वेगवेगळ्या समस्यांबाबत चर्चा करून विविध उपचाराबाबत माहिती दिली व मार्गदर्शन केले. चौथे मार्गदर्शन मा. डॉ.पवन पाटील जिल्हा विद्यार्थी विकास अधिकारी कबचौ उमवि जळगाव, यांनी महिला आरोग्य व प्रसार माध्यमे या विषयावर प्रसार माध्यमांच्या माध्यमातून महिलांच्या आरोग्य विषयक समस्या याबाबत समाजकार्य महाविद्यालयाच्या युवतींनी जनजागृती करण्यासाठी पुढे यावे असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचा समारोप सत्रात विद्यार्थिनी मनोगतात अस्मिता बैसाने वर्षा पाटील चैताली पाटील प्रताप महाविद्यालय, मयुरी पवार धनदाई महाविद्यालय, शितल बाविस्कर समाजकार्य महाविद्यालय यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थिनींना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. विवेकानंदजी भांडारकर यांनी युवतींसाठी अशा कार्यशाळा नियमित होणे आवश्यक त्यामुळे युवतींच्या व्यक्तिमत्व विकास चालना मिळते कार्यशाळा यशस्वी झाल्याबाबत शुभेच्छा दिल्या होते.
या कार्यशाळेत एकूण 74 विद्यार्थिनींचा सहभाग होता.
सूत्रसंचालन निकिता वरुळे, पाटील निशिगंधा, देवयानी पाटील, गायत्री महाजन यांनी केले. व आभार प्रा. डॉ. श्वेता वैद्य यांनी मांनले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयचे प्राचार्य डॉ.पी एस पाटील यांच्या मार्गदर्शनातून कार्यशाळा नियोजन प्रा.डॉ.अनिता एम. खेडकर,. विद्यार्थी विकास अधिकारी यांनी केले. प्रा. चंद्रशेखर बोरसे सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी, प्रा. डॉ. श्वेता वैद्य, प्रा. डॉ. अस्मिता धनवंत सरवैया प्रा.विजयकुमार वाघमारे, प्रा. डॉ.भरत खंडागळे, प्रा. डॉ.श्वेता वैद्य प्रा. डॉ. जगदीश, प्रा.डॉ. सागर चव्हाण सोनवणे,प्रा.डी.आर.ढगे कार्यालयीन अधिक्षक श्री अनिल वाणी,श्रीमती ज्योती सोनार, प्राध्यापक वृंद, प्राध्यापकेत्तर कर्मचारी, महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थींनी उपस्थित होते.