दैनिक चालू वार्ता.
मिलिंद खरात.
पालघर जिल्हा प्रतिनिधी.
विक्रमगड तालुका
विक्रमगड तालुक्यात मागच्या आठवड्यात मुसळधार पावसामुळे अनेक खेडे- पाडे येथील रस्ते, साकाव(लहान पुल, मोरी) नादुरुस्त होऊन रहदारी व दळणळणाच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. रस्ते, साकाव दुरुस्ती ची मागणी आदिवासी बांधवांनी अनेक वेळा विक्रमगड सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हापरिषदे कडे करूनही संबधित कार्यालये दुर्लक्ष करीत आहेत. शेवटी वेहलपाडा, कास पाडा येथील आदिवासी बांधवांनी एकत्र येऊन श्रमदानातून साकावा वरील खड्डे मातीने भरून तात्पुरती येण्या जाण्याची व्यवस्था करुन रस्त्यावरील खड्डे देखील माती दगडांचा भराव करून दुरुस्त केले. तरी देखील अजून विक्रमगड सार्वजनिक बांधकाम विभाग, पालघर जिल्हा परिषद बांधकाम विभागाला जाग येत नाही. शासन, प्रशासन, आदिवासी बांधवांकडे कधी लक्ष देणार असा प्रश्र्न पडला आहे.