दैनिक चालु वार्ता
सोनखेड प्रतिनिधी
बाजीराव गायकवाड
सोनखेड :- सोनखेड ते लातूर फाटा नांदेड रस्ता मृत्यूचे व्दार बनला असून दररोज एक ते दोन अपघात ठरलेले असतात. हे अपघात होण्याचे मुख्य कारण के. टी. आय. एल. कंपनीने जागोजागी रस्ते खोदून ठेवल्यामुळे आणि पर्यायी व्यवस्था केली नसल्यामुळे होत आहेत. या मार्गावर नांदेड ते बिदर शिख बांधव मोठ्या प्रमाणात गुरूद्वार्याच्या दर्शन घेण्यासाठी प्रवास करतात. तसेच मुंबई, पुणे, पंढरपूर, लातूर येथे जाण्यासाठी हाच राज्य महामार्ग आहे. दोन राज्याना जोडणारा मुख्य महामार्ग राज्य रस्ता आहे. एवढेच नव्हे तर ग्रामीण भागातील अनेक गावे या रस्त्यावरून प्रवास करतात.
के. टी. आय. एल. या कंपनीने यमाचे व्दार सगळीकडे खुले केले आहेत. आतापर्यंत दहा ते पंधरा प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. परंतु या राज्य महामार्गावर कोणत्याही प्रकारचे बोर्ड लावलेले नाहीत. पर्यायी रस्ता तयार न करताच काम चालू आहे. जानापुरी, वाडी पाटी, विद्यापीठ या ठिकाणी अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. लोकप्रतिनिधींनी या रस्त्यावर थोडे लक्ष्य देऊन पर्यायी रस्ता तयार करण्यासाठी कंपनीच्या लक्षात आणून दिले तर बरे होईल व प्रवशांचे जाणारे जिव वाचवण्यासाठी पर्यायी रस्ता तयार करण्यासाठी कंपनीला भाग पाडावे असे प्रवाशांनी पालकमंत्री, आमदार, खासदार यांना कळविले आहे.