
दैनिक चालु वार्ता
अक्कलकुवा प्रतिनिधी
आपसिंग पाडवी
अक्कलकुवा :- भारतीय स्वांत्र्यलढ्यात आदिवासी क्रांतिवीर नेहमीच अग्रेसर होते पण प्रस्तापित इतिहासकारांनी हा आदिवासी लढ्याचा, क्रांतिवीरांचा इतिहास कधीच समोर येवू दिला नाही. ही भारतीय इतिहासाची शोकांतिकाच आहे. सिद्धू कान्हा, राणी गायडीनल्लू, बिरसा मुंडा, राणी दुर्गावती मडावी, राणा पुंजा भिल , खाज्या नाईक, झलकारी बाई , टंट्या मामा, राघोजी भांगरे, भीमा नाईक, नंदुरबार जिल्ह्यातील किरसिंग भील, रुमाल्या नाईक असे अगणित नावे समोर येतात.
महात्मा गांधींनी सुरू केलेले “चले जाव” चळवळीत नंदुरबारच्या शिरीष कुमार मेहता या बाल क्रांतीवीरास इंग्रजांनी गोळ्या मारून ठार केले हा इतिहास समोर येतो परंतु शिरीष कुमार सोबत किरसिंग भील यांना देखील इंग्रजांनी गोळी लागून ठार केले हा इतिहास कधीच समोर आला नाही असे का? इतिहासासोबत असे छेडखानी का म्हणून करावी? ही मानसिकता लक्षात घेतली पाहिजे.
इ. स. सन 1857 च्या स्वातंत्र्यलढ्यातील आदिवासी क्रांतिवीर देखिल मागे नव्हते त्याच्यातील खाज्या नाईक एक धुरंदर नेतृत्व सातपुडा परिसरामध्ये इंग्रजांविरुद्ध लाखो आदिवासी स्त्री, पुरुष तरुणांना घेऊन इंग्रजांशी दगड, कुऱ्हाडे, गोफण, बाला घेऊन लढत होते.
खाज्या नाईक हे इंग्रजांच्या पोलीस खात्यात नोकरी करत होते. कलेक्टर मेन्सफिल्ड याने सेंधवा ते शिरपूर या 40 मैल च्या रस्त्यावर त्यांची नेमणूक केली होती. खाज्या नाईक प्रामाणिकपणे वीस वर्षे काम केले परंतु ऐकेदिवशी गुन्ह्याचा तपास करण्याच्या कामात त्यांच्या हातून एक गुन्हेगाराच्या कबुली जवाब घेताना गुन्हेगार मारला गेला त्यामुळे इंग्रजांनी त्यांना दहा वर्षाची शिक्षा दिली. जेल मध्ये खाज्या नाईक यांची वागणूक चांगली असल्यामुळे पाच वर्षाची शिक्षा माफ करण्यात आली आणि ई स. 1855 झाली त्यांना पुन्हा सोडण्यात आले.
त्यावेळी अनेक भारतभर इंग्रज व सेठ सहकार आदिवासींना छळत होते, लुटत होते, जल जंगल, जमीन वर अतिक्रमण करत आदिवासींना हीन वागणूक देत होते या गोष्टीच्या खाज्या नाईक वर परिणाम जाणवत होता कारण त्या काळी उत्तर भारतात बंडाच्या घटना घडू लागल्या होत्या. 1857 मध्ये खाज्या नाईक यांची सेंधवा ते शिरपूर घाटात पुन्हा नेमणूक करण्यात आली पण त्यांना नोकरीत रस राहिला नव्हता. स्वातंत्र्याचा आणि आदिवासी ,पारंपरिक जीवनावर होणारे विविध घटना डोळ्यासमोर येत असल्याने नोकरी सोडून स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले.
भीमा नाईक, कालू बाबा, बालू रावत असे अनेक साथीदार त्यांना मिळाले. भीमा नाईक आणि खाज्या नाईक यांनी शिरपूरला संयुक्तपणे 29 ऑक्टोबर 1857 रोजी हल्ला केला त्यात एक हजार पाचशे आदिवासींनी भाग घेतला होता. इंग्रज कॅप्टन याने त्यांच्या 56 किलो मीटर पाठलाग गेला परंतु त्याला काही हाती लागले नाही पुन्हा 1 ऑक्टोंबर 1857 ला खाज्या नाईक, भीमा नाईक यांनी इंग्रज सरकारच्या कलेक्टरच्या नाका जवळून लूट करून कमालच केली तेव्हा पासून पुन्हा कलेक्टरांना चांगली जबर बसली.
17 नोव्हेंबर 1857 पर्यंत इंग्रांविरुद्ध लढ्यासाठी खाजा नाईक यांनी स्त्री-पुरुष तरुण असे करून 1500 आदिवासींची मोठी तुकडी तयार केली होती आणि इंग्रजांच्या विरोधात लढत होते. त्यावेळच्या खानदेशच्या हद्दीपासून तीस मैलावर उत्तरेस होळकरांच्या हद्दीत ला “जामली चौकी” जवळ इंदोर हून मुंबई कडे जाणारा सात लाखांचा खजिना बैलगाडीतून जात होता तो त्यांनी लुटला आणि ब्रिटिश सत्तेला जबरदस्त आव्हान दिले. अहमदनगर जिल्ह्यातील भागोजी नाईक व त्यातील काही सैनिक खाज्या नाईक सोबत मिळाले नंतर ते शांत बसले नाही.
सेंधवा घाटातील टेलिफोनच्या तारा तोडल्या, पोस्ट ऑफिस लुटले, भरलेली सात बैलगाड्या लुटले अशा रीतीने त्यांच्या इंग्रजां सोबत लढाई सुरू च होती. आसपाच्या राज्यातील रोहिले, पठाण, मकरानी पेंढारी सैनिकांनी यांनी त्यांना साथ दिली होती. त्या काळात खाज्या नाईक यांचे घर सेंधवा येथे होते तो आपल्या घरी येत जात होता परंतु ब्रिटिश सरकार त्यांना अटक करू शकत नव्हते यावरून इंग्रजांना खाज्या नाईक यांच्या केवढा मोठा दरारा त्या परिसरात होता हे दिसून येते.
11 एप्रिल 1857 इंग्रांविरुध्द मोठी लढाई सुरू होती. हा अंबापाणी संग्राम इतिहासात अजरामर आहे. खाज्या नाईक , दौलतसिंग नाईक, नाईक भीमा नाईक यासारखे क्रांतिकारी साथीदार एकत्रित झाले होते. डोंगराच्या शिखरावर सगळे जमले आणि मोठ्या खडकाचा आश्रय घेऊन लढत होते. ही लढाई सकाळी 8:00 वाजेपासून सुरू होऊन दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू होती. बंडखोर आदिवासींच्या स्त्रियादेखील या लढाईमध्ये मागें नव्हते. त्या अत्यंत महत्त्वाचे काम करत गुप्त माहिती देणे, लढण्याचे साहित्य पुरवणे, बाकरी देने असे व स्वतः पुढे होवून धनुष्यबान तीर कमान चालवणे तसेच शत्रूच्या हालाखीच्या निरोप गुप्तपणे पोहोचवणे वेळप्रसंगी लढाईत भाग घेणे त्यामुळे इंग्रजांना त्या त्रासदायक वाटायचे.
या लढ्यात अनेक आदिवासी शहीद झाले. काहींना जिवंत पकडून त्यांना लष्करी डोल वाजून गोळ्या घालून ठार मारण्यात आले. या लढाईत खाज्या नाईकचा मुलगा दौलत सिंग मारला गेला अनेक बंडखोर जखमी झालेत. या लढाईत 460 क्रांतिवीर शहीद झाले होते खाज्या नाईक यांची बायको भीमा नाईक यांचे पुतणे असे अनेक स्त्रिया होत्या. परिसरात दहशत बसवण्यासाठी, पुन्हा कोणी इंग्रजांविरुद्ध आवाज उठवू नये म्हणून पुढे अनेक चकमकीनंतर खाज्या नाईक इंग्रजांच्या हाती लागले तेव्हा इंग्रजांनी खाज्या नाईक यांचे डोके कापून लिंबाच्या झाडाला आठ दिवस टांगून ठेवले होते.
अशा या भारतीय इतिहासातील थोर क्रांतीविरांची शहीद दिवस तारीख निश्चित नाही पण 11 एप्रिल 1858 रोजी आंबापाणी स्वातंत्र्य संग्रामात 4600 आदिवासी क्रांतिवीर शहीद झाले निमित्ताने 12 एप्रिल रोजी सातपुडा परिसरात या दिवसाला क्रांतिवीर बहादूर खाज्या नाईक प्रेरणा दिवस म्हणून साजरी करत त्याच्या प्रेरणा घेतात.
आपसिंग पाडवी रा.मोगरा ता.अक्कलकुवा