
दैनिक चालु वार्ता
परतूर प्रतिनिधी
नामदेव तौर
परतूर :- परतूर येथील युवक शेतकरी दिनकर हरिभाऊ मुजमुले वय 35 वर्षे याने गुरुवार ता.14 रोजी रात्री 7: 30 च्या सुमारास स्वतःच्या शेतातील बोरीच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच घटस्थापस्थळी पोलीस शिपाई श्री. अशोक गाढवे,श्यामुअल गायकवाड, श्री कोकाटे यांनी भेट देत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्याकरिता परतूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले .उत्तरीय तपासणी झाल्यानंतर मृतदेह नातेवाईक स्वाधीन करण्यात आला.
सतत शेतीपिकाचे होणारे नुकसान,नापिकता यामुळे हे पाऊल उचलायचे असल्याचे बोलले जात आहे तसेच भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया व महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे पाच लाखाच्या वर कर्ज असल्याचे समजते तसेच काही खाजगी सावकाराचे पण कर्ज होते. खाजगी सावकाराने तगादा लावल्याने हे पाऊल त्यांनी उचले असे पण बोले जात आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा,एक मुलगी, पत्नी आई असं मोठा परिवार आहे.
घटनेची नोंद पोलीस ठाण्यात देण्यात आली असून घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन गट्टूवार हे करीत असल्याची माहिती श्री अशोक गाढवे यांनी दिली.