
दैनिक चालु वार्ता
जव्हार प्रतिनिधी
जव्हार :- बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिकार अधिनियमानुसार,ऑनलाइन लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या मुलांचे प्रवेश २० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या होत्या परंतु आता ही प्रवेश प्रक्रिया २९ एप्रिल पर्यंत होणार असून पालकांना व विध्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ऑनलाइन प्रक्रियेतील तांत्रिक समस्यांमुळे मोठी गैरसोय सहन करावी लागत होती.तालुक्यातील ३ शाळांमधून ४० विध्यार्थ्यांना आर टी ई अंतर्गत मोफत शिक्षण मिळणार होते त्याबाबतची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून ४० पैकी २६ विद्यार्थ्यांनी आरटीई अंतर्गत आपला प्रवेश निश्चित केला आहे.
आरटीई अंतर्गत मोफत प्रवेश प्रक्रियेसाठी जव्हार तालुक्यातील ३ शाळांमध्ये ४० मुला-मुलींना प्रवेश देण्यात येणार आहेत.४० जागांसाठी ७७ अर्ज ऑनलाइन प्रणालीद्वारे दाखल करण्यात आले होते,.दाखल झालेल्या अर्जाची छाननी करून ऑनलाइन लॉटरी काढण्यात आली होती.लॉटरी पद्धतीतून ४० जणांची निवड करण्यात आली होती.त्यापैकी आतापर्यंत २६ विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित केला आहे.
आर टी ई अंतर्गत प्रवेश घेण्यासाठी ची २० एप्रिल तारीख वाढवून ती २९ एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
पुंडलिक चौधरी
प्रभारी गटशिक्षणाधिकारी
जव्हार पंचायत समिती