दैनिक चालु वार्ता
पालघर प्रतिनिधी
अनंता टोपले
पालघर :- जव्हार तालुक्यातील दसकोड ग्रामपंचायत पैकी दहावाडपाडा या गावामध्ये एकूण 25 कुटुंब राहत असून गावातील एकूण लोकसंख्या 114 इतकी आहे या गावात विहरीला पाण्याचा साठा हा पावसाळी पूर्णता असून शेवटी विहीर कोरडी पडते. यामुळे गावातील नागरिकांना महिलांना सकाळी उठल्या उठल्या पाण्याची चिंता सतावत असे या साठी गावातील सर्वच नागरिकांना व शाळेतील मुलांना पाण्यासाठी वणवन पायपीट करून 2 ते 3 किलोमीटर अंतरावरून पाणी नदीच्या काठी कुठेतरी खड्डा मारून ते पाणी पिण्यासाठी डोक्यावर आणावे लागत असे हे वर्षानु वर्षे चालत होते महिलांना पाणी आणता आणता खूप त्रास सहन करावा लागत होता.
याच्यावर मात करण्यासाठी गावातील श्री. दिलीप रामू खरपडे या सुशिक्षित तरुणांने पामस एनर्जी कंपनी (सौलार सिस्टीम) नाशिक चे चेयरमन मा.श्री. प्रवीण गुळवे यांच्या मार्गदर्शना खाली व संदीप दाहवाड, सुनील दाहवाड, सचिन दाहवाड तसेच गावाकऱ्याच्या श्रमदानातून व मदतीने तसेच राम कृष्ण मिशन मुंबई यां संस्थेचे पूजनीय स्वामीसत्यदेवनंदजी व श्री. अशोक रॉय चौधरीजी यांना भेट घेऊन गावाची पाण्याची व्यथामांडून त्यांना विनंती करून पाण्याची सोय करण्यास सांगून यावर कामकरण्यास सांगितले त्याच बरोबर त्यांनी तयारी दर्शवून कामाला सुरुवात देखील केली.
या मध्ये गावा साठी नवीन विहीर खोदून बांधकाम करून सौरऊर्जाआधारित सोलर बसवून पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाकेली गावात पाणी आल्याने गावकर्यांनी मोठा आनंदनिर्माण झाला यावेळी पाणीआल्याने राम कृष्ण मिशन मुंबई च्या हस्ते पूजनीय स्वामीसत्यदेवनंदजी श्री.अलोक रॉय चौधरी तसेच पामस एनर्जी कंपनी चे श्री. प्रवीण गुळवे साहेब यांच्या सर्वांच्या हस्ते श्रीफळ फोडून नळाचे पाणी नागरिकांना उपलब्ध करून दिले या कार्यक्रम प्रसंगी गावातील सहकारी ग्रामस्थ उपस्तित होते या कामाचे सर्वच स्तरावरून कौतुकहोत आहे.