दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
अमरावती :- अंजनगाव तालुक्यात दि .२४ एप्रिल २०२२ रोजी ‘ किसान भागीदारी प्राथमिकता हमारी’ या अभियानाअंतर्गत संपूर्ण जिल्ह्यात रविवार विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या फायद्याच्या अनेक योजनांची माहीती देण्यासाठी कृषी संबंधी विविध शासकिय कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते.परंतू भंडारज येथील सदर ग्रामसभेला कृषी सहायक,पशू चिकीत्सक व तलाठी हे उपस्थित न राहल्यामूळे शेतकऱ्यांना परत जावे लागले.
यासंबंधी भंडारज ग्रा.प.चे सदस्य निलेश चोपडे यांनी संबंधितांच्या वरिष्ठांशी फोनवर चर्चा केली असता, या सर्वांनी उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे सांगीतले तसेच अनुपस्थिती बद्दल सदर कर्मचाऱ्यांना नोटीस देण्यात येणार असल्याचे सांगीतले. या प्रकाराबद्दल सर्व शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला असून शासकिय कर्मचाऱ्यांची उदासिनता दिसत आहे .