दैनिक चालु वार्ता
पुणे प्रतिनिधी
शाम पुणेकर
पुणे :- राज ठाकरेंच्या औरंगाबादेत होणा-या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे हटविण्यासाठी 3 मे पर्यंत अल्टिमेटम दिला असल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. या घडामोडी घडत असताना पुण्यातून एक समाधानकारक बातमी समोर आली आहे. पुण्यातील पाच मशिदींच्या मौलवांनी ईदच्या दिवशी डीजे न लावण्याचा निर्णय घेतला आहे. डीजेला जितके पैसे लागतील तितके पैसे वाचवून ते गरिब आणि गरजूंच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
तसेच मुस्लीम समाजातील तरुणांनी २ मे रोजी ईद-उल-फित्र उत्सवादरम्यान मोठ्या आवाजात डीजे लावू नका, असं आवाहन केलं आहे. जाती, धर्माच्या पलिकडे आपण सर्वात आधी भारतीय नागरिक आहोत. धर्मभेद टाळावेत. माणसाला माणसासोबत माणुसकी आणि आपुलकीने वागवलं जावं, अशीच प्रत्येक सर्वसामान्याची माफक अपेक्षा असते. पण काही गोष्टी अनपेक्षित घडतात. त्या घडू नये ही सर्वांनी अपेक्षा व्यक्त केली.