दैनिक चालु वार्ता
पुणे प्रतिनिधी
शाम पुणेकर
पुणे :- राज्यातील मुदत संपलेल्या महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतींसह जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका कधी होणार असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र आता हा प्रश्न लवकरच सुटणार आहे. कारण, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास आमची यंत्रणा सज्ज आहे, असं निवडणुक आयोगाने म्हटलं आहे. निवडणूक आयोगाने तसं पत्र प्रतिज्ञापत्रात सर्वोच्च न्यायालयात दिले आहे. राज्यात ज्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत, त्याठिकाणी तत्काळ प्रक्रिया सुरू केल्यास मनपा निवडणुका घेणं केव्हाही शक्य आहे असा पवित्रा निवडणूक आयोगाने घेतला आहे. परंतु राज्य सरकार ह्या संदर्भातील प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने न्यायालय निर्णयाच्या प्रतिक्षेत आहे.