दैनिक चालु वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
मोताळा -दि.२.
देशात इतर राजकीय पक्षांनी जातीयवादी भूमिका घेत समाज मनावर विपरीत परिणाम घडून त्यातून होणाऱ्या संभाव्य धोक्याच्या वळणावर असणाऱ्या महाराष्ट्रात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता वंचित बहुजन आघाडी, मो ता ळा तालुका वतीने शहरात शांतता मार्चचे आयोजन करण्यात येवून यात वंचित बहुजन आघाडीचे तालुका व शहर पदाधिकारी,कार्यकर्ते सामील झाले.
वंचित बहुजन आघाडीचे सर्वसर्वा प्रकाश आंबेडकर व राष्ट्रीय अध्यक्षा रेखाताई ठाकुर यांच्या आदेशाने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून समाजात दूही माजवणाऱ्या व त्यातून आपल्या स्वार्थासाठी भोंगा,हनुमानचालिसा पठण या सारख्या धार्मिक विषयावर बोलून राजकीय पोळी शेकणाऱ्या पक्षांच्या भूमिकांमुळे व्यथित शांतता प्रिय लोकांच्या मनात,येणाऱ्या सणासुदीच्या दिवसांत शहरात शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तालुका अध्यक्ष युवराज भिडे व बुलडाणा जिल्हा अध्यक्ष नीलेश जाधव तसेच महासचिव प्रशांतभाऊ वाघोदे यांच्या नेतृत्वाखाली सदर शांतता मार्चचे आयोजन करण्यात आले होते. यात कोणत्याही प्रकारचे वाद्य अथवा चेथावनीखोर घोषणा न देता हा शांतता मार्च डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी संविधान प्रास्ताविकेचे सामुहिकपणे वाचन करून मार्चची सांगता करण्यात आली.
यावेळी तालुका महासचिव विजय दोडे,विशाल मोरे, तालुका उपाध्यक्ष समाधान डोंगरे, तसेच नवनीत शिरसाट, डब्ल्यू.डी.वानखडे, तेलंग साहेब, वकील, जनार्दन झिने, राजू गायकवाड, खराटे फौजी यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.