दैनिक चालू वार्ता किनवट प्रतिनिधी- दशरथ आंबेकर
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अतंर्गत किनवट तालुक्यात चिखली ( ई ) या गावाची निवड झाली असुन, गावाचा सर्वांगीण विकास लक्षात घेता सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य, शिक्षण , पर्यावरण, जल व मृद संधारण व पायाभूत सुविधांचा विकासाशी निगडीत कामांचा समावेश करून कुटुंबांना १०० दिवसाचा रोजगार उपलब्ध करुन देणे, दशवार्षिक आराखडा नियोजनामध्ये महाराष्ट्र रोजगार हमी योजने अतंर्गत जनावराचा गोठा , विहिर, फळबाग, शेत तळे,वृक्ष लागवड, अशा विविध योजना दहा वर्षात देऊन गाव समृद्ध करण्याचा मानस शासनाचा आहे हा कार्यक्रम २६ एप्रिल ते २९ एप्रील पर्यंत राबविण्यात आलाय, या कार्यक्रमासाठी महसूल विभाग , वन विभाग , कृषी विभागाचे अधिकारी येऊन आराखडा तयार करण्यात आला आहे. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पाडण्यासाठी येथील सरपंच विठ्ठल सिंगरवाड ग्रामविकास अधिकारी राजेश दमोकोडवाड इंजिनिअर यमलवाड, थोरात साहेब , इंजिनिअर मदने , निशा मोरे ,पवन नगेवाड ,रुषी झरेवाड , देविदास तोटावाड ,व ग्रामस्थ यांनी परिश्रम केले आहे