दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी – शाम पुणेकर
पुणे : पुणे-सातारा रस्त्यावर पुणेकरांची बेकायदा वसुली थांबविण्यात यावी आणि खेड शिवापूरचा टोलनाकाच हटविण्यात यावा, अशी मागणी करीत विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह ४६ संघटना आंदोलनात उतरल्या आहेत. त्यानुसार कात्रज चौकात धरणे आंदोलन आणि नागरिकांच्या स्वाक्षरीची मोहीम राबिवण्यात आली. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचा भाग असलेल्या पुणे ते सातारा या रस्त्याच्या सहापदरीकरणाचे काम ऑक्टोबर २०१० मध्ये सुरू करण्यात आले होते. रिलायन्स इन्फ्रा कंपनीकडून सातत्याने हे काम रखडत गेले. मार्च २०१३ पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित असताना ते १२ वर्षांनंतर अद्यापही पूर्ण झालेले नाही. याबाबत आंदोलने आणि तक्रारी झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी ठेकेदाराकडून टोलवसुलीचा ठेका काढून घेण्यात आला असून, आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून टोलची वसुली करण्यात येत आहे.
रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत MH 12 आणि MH 14 च्या सर्व वाहनांना टोल फ्री करावे अशी आंदोलकांची मागणी आहे .