दैनिक चालू वार्ता कंधार/लोहा विशेष प्रतिनिधी (ओंकार लव्हेकर)
आज माझ्या मित्राला जाऊन एक वर्ष पूर्ण झाले. असा एकही दिवस नसेल की देशमुख सरची आठवण झाली नसेल. सर ज्यावेळेस माझ्या सोबत असायचे त्यावेळेस वेगळाच आधार होता. गेल्या पंचवीस वर्षाची आमची मैत्री तरी पण एकही दिवस गेला नाही की सरांनी मला फोन केला नाही अथवा मी ! अगदी सोबत असताना कधी जाणवले नाही की, जगात माणूस जसे आई,वडील,भाऊ,बहीण, मुले पत्नी यांच्यावरवार प्रेम करतो तसेच ‘ मित्रावर जीव तोडून प्रेम करतो.हे देशमुख सर गेल्यावर कळले.
नागनाथ देशमुख उर्फ एन. डी.देशमुख सर म्हणून जास्त नावाजलेले. जण माणसात उच्च प्रतीचा माणूस , एक आदर्श व्यक्तिमत्व,आदर्श शिक्षक, विद्यार्थीप्रिय शिक्षक, सत्य बोलणारे पण शांत तसेच शिस्तप्रिय आदर्श पालक आदर्श पिता माझ्या जीवनातील आदर्श मित्र ! आमची मैत्री ही सुखं दुःखाच्या पलीकडची होती.सरचा शब्द हा माझ्यासाठी ….श्वास वाटत होता.मी थोडा ताठर भूमिकेचा पण सर अगदी शांत आणि संयमी ते सतत मला समजून सांगायचे आणि मी सहज समजून घ्यायचो. एकमेकाला त्रास होणार याची आम्ही तसेच काळजी घेत असोत.कधी असे घडलेही नाही.
सरचा घरचा संसार एकदम मस्त मुले सुशिक्षित , संस्कारशील व आदर्श पत्नी जशी काही घर म्हणजे मंदिरच होते. तर आम्ही सतत सोबतच असल्यामुळे सुख दुःख याची खात्रीने चर्चा होऊन मार्ग निघत असे.फोन कधी लावावा कधी लाऊ नये याचे बिलकुल बंधन नव्हते.यामुळे विश्वास हा वाढत गेला. अन् आमच्या मैत्रीतील ही विश्र्वास हा शब्दात व्यक्त करण्या सारखा नाही. शब्द हाच विश्वास! अन् काही अडचणी प्रसंगात डोळे हेच उत्तर होते. सराना काही अधिकारी माझे ‘वकील’ म्हणून नाव सांगत होते.
पण गेला मार्च महिना आमच्या मैत्रीला अडसर ठरला. सर कोरोना बादित झाले. एवढी मैत्री असताना सुद्धा, सर बाधित झाल्यावर माझ्यावर चीडचीड करत होते.माझा फोन उचलत नव्हते. मला वाटले काही अडचण असेल.पण मला करमत नाही.मी बेचैन होतो.पण मार्चचे काम भरपूर होते.मला वाटले करतील फोन.पण ज्या वेळेस सरच्या घरून मुलीचा फोन आला.काका ! कुठे आहात मी म्हणालो माझ्या घरी! तसे नाही काका ! माझ्या पप्पाला आज हैद्राबाद हलवित आहेत.मी म्हणालो का? काका ,पप्पांना कोरोना झालाय ! क्षणभर अंगामध्ये वीज चमकली.डोळे अश्रूंनी चिंब भरलेले. कंठ दाटून आला.अन् समजले मैत्री काय असते.मित्र कसा असावा म्हणून सर माझ्यावर रागात येत होते.चीडचीड करत होते.मला फोन केला की ‘वसकन ‘करत होते. कारण मीही कोरोना बाधित होईल अन् माझा जीव धोक्यात जाईल म्हणून ……सरांची माझी भेट व्हिडिओ कॉल करून व्हायची ! सर मला मला बघुन अन् मी माझ्या मित्राला बघत राहिलो.एक महिना मित्रांने झुंज दिली.मी सरला अन् त्यांचा कुटूबाला आधार देत होतो. खूप खरचा करून , देवदेव केले,नवस बोलले,उपवास केले,पूजा नारळ अर्पण केले .पण या ताठर भगवंताला कशी किव आली नाही. एवढा देव नाराज का झाला असेल.यांचा सवाल मला पडत आहे.माझ्या हाताला यश आहे असे सगळे म्हणतात पण येथे का यश आले नाही. माझ्या मैत्रित खोटं होती का ? जो मित्र शेवट पर्यंत माझी साथ सोडणार नाही असे वचन दिलं होत. पण हा मैत्रीचा हात का अर्धवट राहिला.यांचे आजुन कोडे उलगडले नाही…….आज सराना जाऊन एक वर्ष पूर्ण होत आहे सर आपल्या मैत्रीला सलाम!………..तुमचाच वेडा मित्र! सर कोरोना पुन्हा जाऊन आलाय……पण तुम्ही कधी येणार!ओंकार लव्हेकर,कंधार🥲