दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णी-श्री,रमेश राठोड
=========================
आर्णि:-पंचायत समिती आर्णी अंतर्गत असलेल्या पळशी गट ग्रामपंचायत वार्ड क्रमांक ३ साखरा तांडा यांच्यामध्ये लोकांची विकास कामे थकलेले आहे.
असून वारंवार जिल्हा अधिकारी साहेब यांच्याकडे लेखी निवेदन देण्यात आले .
आर्णी पंचायत समिती अंतर्गत गटविकास अधिकारी साहेब यांना सुद्धा आपल्या निवेदन देण्यात आले आहे.वारंवार विकास कामाबाबत तक्रार देऊनही तिथल्या लोकांनी समस्या सोडविण्यासाठी शासन स्तरावर किंवा सरपंच सचिव यांच्या साखरा तांडा या गावावर नेहमी विकासापासून वंचित ठेवण्याचे काम करीत आहे ..
ग्रामपंचायत स्तरावर जिल्हाधिकारी साहेब सुद्धा लेखी स्वरूपात देत नाही कामाची दखल घेत नाही अपंगांना विधवा महिलांचे घरकुलाचा फायदे सुद्धा मिळाले नाही आणि शासनाच्या १५ वित्त आयोगाच्य माध्यमातून जीआर असल्यामुळे २००१६ घ्या ५% टक्के निधी सुद्धा मिळाले नाही करिता त्यांनी आपले निवेदन द्वारे लेखी स्वरुपात सादर केले आहे तिथल्या लोकांनी व नागरिकांना कामाची व्यवस्थितपणे निर्णय मिळत नसल्यामुळे त्यांच्या मनात शासन प्रशासकीय विभागात विश्वास उडाला असून तरी शासकीय शासन दरबारी आम्हाला न्याय मिळावा याकरिता सुरेश फुलशिगं राठोड उदयसिंग पवार तुकाराम रामदास पवार पंडित मंगु चव्हाण, सिताराम राठोड, राजू राठोड ,आनंदराव राठोड , भिकू राठोड,तुकाराम राठोड, रामराव पवार, असे अनेक १६ कार्यकर्ते यांनी आपल्या निवेदनात सह्या सहित निवेदन देण्यात आले आहे