दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
नांदुरा:दि.७.–डॉन चित्रपटातील अजूनही सुपरहिट असलेला डायलॉग म्हणजे”डॉन को पकडना मुश्कील ही नही, नामुमकीन है”हा होय!हा संवाद आठवण्याचे कारण म्हणजे महा विकास आघाडीचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी काल केलेले विधान असून त्यांनी पुढील सर्व निवडणुका आघाडी एकत्र लढवणार असल्याचा दावा केला आहे.मात्र बुलढाणा जिल्ह्याचे राजकीय व आघाडीचे चित्र लक्षात घेतले तर या संवादा प्रमाणे नामुमकीन असल्याचे मजेदार चित्र आणि राजकीय वास्तव देखील आहे.
सुप्रीम कोर्टाचा धक्का आणि आयोगाने सुरू केली स्थानिक स्वराज्य निवडणुकांची पूर्वतयारी या पार्श्वभूमीवर महा विकास आघाडी ची बुलंद तोफ संजय राऊत यांचे हे विधान आले आहे. यामुळे त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे पण दूरवरच्या बुलढाणा जिल्ह्यात तर या विधानाला आघाडी तले नेते गंभीरपणे घेतील असे तूर्तास तरी मुश्कील आहे. याचे कारण तेरा पैकी बहुतेक तालुक्यात आघाडीतील तिनी पक्षात अजिबात ताळमेळ नाही किंबहुना बीघाडीच आहे असे चित्र आहे.
पालक मंत्री पासून सुरुवात करायची झाल्यास सिंदखेड राजा मतदार संघात राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील विस्तव जात नाही हे उघड आहे. माजी आमदार राजेंद्र शिंगणे व शशिकांत खेडेकर यांच्याशी बिघाडी कमी होणे तर दूरच परंतु वाढतच चालली आहे. काँग्रेस पक्षाशी देखील दोघांचे सलोख्याचे संबंध नाहीये. देऊळगाव राजा तालुक्यात ही च स्थिती आहे. सर्वात कळस म्हणजे पालकमंत्री डॉ. शिंगणे व खासदार प्रतापराव जाधव त्यांच्यातील मागील लोकसभा संग्रामातील कटुता व वीसंवाद कायम आहे. दोन मोठ्या नेत्यांत ही स्थिती तर इतरांचं काय? असा प्रश्न निर्माण होतो.
मे हकर व लोणार मध्ये काँग्रेस व सेना एकत्र येणे तर महा नामुमकिन आहे.या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचे जेमतेम असल्याने व राष्ट्रवादी सेना मधील वीत्कृष्ट पाहता आघाडी द्वारे निवडणुका “मुंगेरीलाल के हसीन सपने” असेच म्हणावे लागेल ! बुलढाणा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशा छुपा (खर तर उघडच) सामना आहे. राष्ट्रवादी या दोघांपासून सुरक्षित अंतर राखून आहे.
मोताळा नगरपंचायत च्या निवडणुकीत शेवटपर्यंत आघाडी न झाल्याने ही बि घाडी सिद्ध झाली.मलकापुर, नांदुरा, जळगाव, संग्रामपूर, खामगाव, शेगाव, मंध्ये शिवसेना जेमतेम असल्याने त्यांना काँग्रेस गंभीरतेने घ्यायला तयार नाही. तिथे राष्ट्रवादीचे संघटन देखील नेत्या पुरते मर्यादित आहे. संग्रामपूर नगरपंचायत लढतीत त्या तिघा मित्र पक्षांची आघाडी झाली खरी पण नवख्या प्रहार ने त्यांचा एक तर्फे उडविला होता!खामगाव पुरता विचार करायचा तर पालकमंत्री व दिलीपकुमार सानंदा यांच्यातील अंतर कायम आहे. याशिवाय राष्ट्रवादी आणि शिवसेना कमकुवत असल्याने काँग्रेस त्यांना जादा जागा देऊ इच्छित नाही.
शेगाव मंध्ये असेच चित्र आहे.चिखली मध्ये काँग्रेस या दोघांच्या तुलनेत स्ट्रॉंग असल्याने एक तर्फे जागा वाटपाची धास्तीवजा शक्यता आहे.तिथे काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे भाजपा सोबत लढत असताना दोन्ही मित्र पक्ष त्यांना साथ देत नाही. दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुलढाणा सह ठिक ठिकाणी केलेल्या वक्तव्यात काँग्रेस स्वबळावर (च ) लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे.