दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
पुणे : एकरी १०० टन ऊस उत्पादनासाठी उपलब्ध तंत्रज्ञान शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, असं आवाहन यावेळी केलं. कृषी विभागामार्फत राबवण्यात येत असलेला एकरी १०० टन ऊस उत्पादन अभियान हा एक चांगला उपक्रम आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील काही ऊस उत्पादक शेतकरी एकरी १०० टनापेक्षा जास्त उत्पादन घेत आहेत. त्यांचा आदर्श घेऊन येथील शेतकऱ्यांनीही उत्पादनात वाढ करावी. सध्याच्या काळात शेतीत नवीन प्रयोग होत आहेत. कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र यांच्या माध्यमातून नवीन प्रयोग शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे. शेती करताना बियाणे निवड, खत मात्रा, सिंचन वापर, ठिबक यंत्रणा व तज्ञांचा सल्ला आवश्यक असतो. शेतकऱ्यांना काळानुरूप नवीन तंत्रज्ञानाची मदत घ्यावी लागणार आहे. ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेतून ऊस पिकांची लागवड केली जाते. साखरेला दर चांगला आहे. परदेशात निर्यात केल्यास चांगला फायदा मिळेल. साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीकडे कल वळवावा. ऊसाएवजी शेतकऱ्यांनी इतर पिकाकडे वळावे. सध्या कापसाला चांगला दर आहे. अशी पिकंही शेतकऱ्यांनी घ्यावीत. शेतकऱ्यांनी पाचट शेतामध्ये जाळू नये. पर्यावरणाचं रक्षण करावं. कृषी विभागातील अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊन पाचटाचं व्यवस्थापन करावं, असं सूचित केलं. याशिवाय माळेगावमधील शासकीय धान्य गोदामाला भेट देऊन तेथील पाहणी केली. कृषी यांत्रिकीकरण उपअभियान तसंच राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत शेती औजारांसाठी बारामती उपविभागात एकूण ४ हजार १३० शेतकऱ्यांना अनुदान मंजूर करण्यात आलं आहे. आज प्रातिनिधिक स्वरूपात काही शेतकऱ्यांना औजारांचं वाटप करण्यात आलं.