दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई – देशातील इंधन दरवाढीवरून भाजप व महाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगले असताना राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी इंधन दरवाढीवरून भाजप नेत्यांवर टीका केली.
2014पूर्वी इंधन दरवाढीवरून आंदोलन करणारे भाजप नेते, कार्यकर्ते लपून बसले आहेत का?, असा टोलाही त्यांनी लगावला
मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, पेट्रोल-डिझेलचे भाव सातत्याने वाढत आहेत. त्याचा परिणाम जीवनावश्य गोष्टींची दरवाढ होत आहे. यावर केंद्र सरकारचे काही नियंत्रण नाही काय? असा प्रश्न पडत आहे. यावर कोणी बोलताना दिसत नाही. जे कायम बोलतात अच्छे दिन आणू ते हेच अच्छे दिन आहेत का? हे विचारण्याची वेळ जनतेवर आली आहे. इंधन दरवाढीचा परिणाम कौटुंबिक बजेटवर होत आहे. इंधन दरवाढीवर आंदोलन करणारे भाजपचे नेते, कार्यकर्ते लपून बसले आहेत का? जनता त्यांना धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही. या कडून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी निरनिराळ्या चौकश्या कारवाया सुरू आहेत. मात्र जनता सुज्ञ आहे. त्यांना समजते केंद्र सरकार त्यांच्यावर जो अन्याय करत आहे. त्याला जनता चोख प्रतिउत्तर देईल, असे मंत्री थोरात यांनी स्पष्ट केले.