दैनिक चालू वार्ता पुणे शहर प्रतिनिधी -विशाल खूने
मुंबई –
टाटा मोटर्स कंपनी चे कर्मचारी बाळासाहेब साळुंखे यांना राज्याचे कामगार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व राज्य कामगार मंत्री ओम प्रकाश बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी मुंबई येथे आयोजित पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या गुणवंत कामगार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
25 हजार रुपये रोख रक्कम व सन्मानचिन्ह मानपत्र व मेडल असे पुरस्काराचे स्वरूप आहे
सत्कार मूर्ती बाळासाहेब साळुंखे हे मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील कारला या गावचे सुपुत्र आहेत ते 1996 पासून टाटा मोटर्स मध्ये कार्यरत आहेत ते माऊली नागरी सहकारी पतसंस्थेचे दहा वर्षे चेअरमन, त्यांनी विद्यार्थ्यांसाठी गुणगौरव स्केटिंग कराटे सायकलिंग अशा वेगवेगळ्या स्पर्धाचे आयोजन करत असतात .
वृक्षारोपण संत गाडगे महाराज ग्राम स्वच्छता अभियान आरोग्य शिबीर, मराठवाडा जनविकास संघ, तिरंगा क्रीडा मंडळ, संस्कार प्रतिष्ठान, टाटा मोटर, समाज विकास केंद्र अशा अनेक मंडळाचे हे पदाधिकारी आहेत. मंडळाच्या माध्यमातून ते सतत समाजोपयोगी कार्यक्रम राबवत असतात.
कोरोणा काळामध्ये गोरगरिबांसाठी अन्नधान्य किराणा कपडे वाटप करून तसेच खोड बाधितांना फळे वाटप करून त्यांना दिलासा देणे उपचारासाठी रुग्णालयांमध्ये जागा मिळवून देणे, रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे अशी अनेक कामे त्यांनी केले आहेत .
नदी प्रदूषण होऊ नये म्हणून निर्माल्य दान पर्यावरण पूरक जलपर्णी काढणे असे अनेक कामे करत आहेत.
त्यांनी पुरस्काराची पूर्ण रक्कम त्यांच्या गावातील तुळजाभवानी मंदिराची उभारण्यासाठी दिले आहे. गुणवंत कामगार पुरस्कार मिळाल्यामुळे टाटा मोटर च्या शिरपेचात मानाचा तुरा उमटला आहे कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी युनियन प्रतिनिधी व पदाधिकारी नेत्यांचा सन्मान व कौतुक करण्यात आला.
कार्यक्रमाला उपस्थिती :- राज्याचे कामगार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्य कामगार मंत्री ओम प्रकाश बच्चू कडू बाळासाहेब साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.