दैनिक चालु वार्ता
अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी
बालाजी देशमुख
घाटसावळी: कोरोना महामारीने उद्भवलेल्या परिस्थितीतून अजूनही लोक पुर्णपणे सावरले नसले तरी शिक्षण क्षेत्रातील काही गुरूजणांनी संकटाला संधी मानत कोरोना महामारी काळात शाळेचे रूपच बदलून टाकले. घाटसावळी येथील केंद्रीय शाळेच्या मुख्याद्यापिका उषा मुंडे व त्यांच्या सहकारी शिक्षीकांनी शाळा बंद असली तरी ऑनलाईनच्या माध्यमातून ज्ञानदानाच्या पवित्र कार्यात खंड पडू दिला नाही. विद्यार्थ्यांची गुणवत्ता तर वाढवलीच मात्रवृक्षारोपन, वृक्ष संवर्धन, शाळेची रंगरंगोटी करून कोरेना काळात शाळेला आणखी सुंदर बनवले. घाटसावळी येथील जिल्हा परिषदेची केंद्रीय शाळा अतिशय सुंदर आहे. प्रवेशव्दारापासूनच झाडे आणि हिरवळीने नटलेला शाळेचा परिसर डोळ्यात भरतो. घाटसावळीची ही शाळा सुंदर होतीच मात्र कोरोना महामारीच्या कठीण काळात ईतर सर्व शाळा बंद असताना या शाळेच्या मुख्याद्यापिका उषा मुंडे यांनी विविध सामाजिक आणि समाजाभीमूख उपक्रम राबवले. इतर शाळांना कोरोना काळात अवकळा आली असताना घाटसावळीच्या शाळेत मात्र सातत्याने उपक्रम सुरू होते. मुख्याद्यापिका उषा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मनिषा एकनाथराव तांदळे, नवनाथ मोरोळे, बालीका खवतड, ज्योती धनवडे, शेख परवीनबाजी, गोविंद जोशी यासर्वांनी मिळून ऑनलाईन व झु मिटिंगच्या माध्यमातून ज्ञानदान सुरूच ठेवले. विद्यार्थ्यांच्या घरोघर भेटी देऊन त्यांना अभ्यासाच्या सुचना दिल्या, त्यांची प्रगती तपासली. होमवर्क आणि स्वाद्याय करून घेतले. एकीकडे ज्ञानदानाचे काम अखंडपणे सुरू ठेवून दुसरीकडे शासनाने कोरोना काळात दिलेली कामे जवाबदारीने केली. झीरो डेथ सर्व्हेक्षण, लसीकरण नोंदणी यासाठी योगदान दिले. यातून मिळालेल्या रिकाम्या वेळेचा सदुपयोग करताना वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन ही कामे केली. शाळेची रंगरंगोटी करून शाळा व भिती बोलक्या केल्या. परसबागेला सुंदर बनवले. मुख्याद्यापिका उषा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षण आणि शिक्षिकांनी दिलेलेल्या योगदानामुळे घाटसावळी येथील केंद्रीय जिल्हा परिषद शाळेचे रूप पालटले आहे.