दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुरक्षा दलांना दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी संपूर्ण समन्वय आणि सक्रियतेने मोहीम राबवण्याचे निर्देश दिले आहेत. दहशतवादाला आळा घालण्यासाठी घुसखोरी पूर्णपणे थांबवणेही आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेताना गृहमंत्री अमित शाह यांनी हे निर्देश दिले आहेत. गृह मंत्रालयाने याबाबत माहिती दिली.
दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेताना गृहमंत्री अमित शाहांनी हे निर्देश दिले आहेत. गृह मंत्रालयाने याबाबत माहिती दिली. शहांनी सुरक्षा दलांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शांततापूर्ण आणि समृद्ध जम्मू-काश्मीरचे स्वप्न पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
गृहमंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, गृहमंत्र्यांनी सांगितले की, ‘सुरक्षा दलांनी घुसखोरी शून्य पातळीवर आणली पाहिजे जेणेकरुन दहशतवादाचा पूर्णपणे नायनाट करता येईल.’ जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले.
दुसरीकडे, जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. ही बैठक अशावेळी झाली, जेव्हा काश्मीरच्या वडगाम जिल्ह्यात राहुल भट्ट नावाच्या काश्मिरी पंडिताची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. याआधीही दहशतवाद्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने अनेक स्थलांतरितांना लक्ष्य केले आहे. या वेळी जम्मू-काश्मीरमध्येही तब्बल दोन वर्षांनी अमरनाथ यात्रा होत आहे. जे 30 जूनपासून प्रस्तावित आहे. या संदर्भात सर्व सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.