दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी-किशोर वाकोडे
तरोडा,(मोताळा): दि. २८
बाबासाहेबांच्या जीवनातील प्रत्येक संकटात रमाई संघर्षरत राहिल्या हे सर्वश्रुत आहे. आपल्या वैवाहिक जीवनात अत्यंत हालअपेष्टा,दुःख, गरिबी यावर मात केली.बाबासाहेबांन पर्यंत दुःखाची झळ पोहोचू दिली नाही. आपल्या संसारात आदर्श पत्नी, सुन,माता, या भूमिका त्यांनी अपार कष्टाने पार पाडल्या. कधी तक्रार नाही की कुठे वाच्छता नाही. अथांग दुःखाचे कधी भांडवल केले नाही . घरातील आर्थिक संकटाचा कोणासही थांगपत्ता लागू दिला नाही.एका मातेसाठी तिचा मुलगा मरण पावणे या सारखे जगात दुसरे दुःख नाही. अशा मातोश्री रमाई भिमराव आंबेडकर यांची ८७ वी पुण्यतिथी. माता रमाई यांच्या पुण्यतिथी निमित्त नागसेन बुद्ध विहार तरोडा येथे मातोश्री रमाई यांच्या प्रतिमेला कार्यक्रमाचे अध्यक्ष गौतम गुळ चवळे यांच्या हस्ते करण्यात पुष्पहार अर्पण करण्यातआले. त्यानंतर त्रिशरण पंचशील घेऊन दोन मिनिट स्तब्ध उभे राहून श्रद्धांजलि अर्पित करून अभिवादन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रामनेर, गौतम म. गुरचवळे हे होते .
या कार्यक्रमाला उपस्थित मंडळी
चंद्रप्रकाश कोलते, गौतम खंडेराव, विजय मोरे, गजानन गुरचवळे ,सिद्धार्थ गुरचवळे, सुनील इंगळे , गौतम ह. गुरचवळे, भाऊजी कोलते, कपिल गुरचवळे, दीपक गुरचवळे, अजय गुरचवळे, अनिकेत मिसाळ, रोहित गुरचवळे, प्रशांत गुरचवळे, आकाश रा. गुरचवळे, राज वाकोडे, तुषार गुरचवळे ,श्रामनेर गौतम गुरचवळे , रमाई महिला मंडळ सर्व समाज बांधव नागसेन बुद्ध विहार समितीअभिवादन करण्यासाठी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व मातोश्री रमाई यांच्या जीवनपटावर मार्गदर्शन बौद्धाचार्य :सतीश गुरचवळे यांनी केले