दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -संभाजी गोसावी .
पाटण. ता तळमावले गावामध्ये जुन्या जाचक आणि कठोर रिती रूढी आणि परंपरा तोडून पाटण तालुक्यांतील काळगांव येथील एका विधवा वहिनीची तिच्या सख्ख्या दिरांशी लग्नगाठ बांधण्याची क्रांतिकारक गोष्ट घडली आहे. संबंधित कुटुंबियांचा निर्णय आदर्शवत असून या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. काळगांव येथील जवळच असलेल्या कुमाळ येथील तेजस्विनी पाटील हिचा त्याच गावातील सुरज दिनकर देसाई यांच्याशी विवाह झाला होता .लग्न होऊन चार वर्षे झाली होती तिला तीन वर्षाचा मुलगाही आहे मात्र काही महिन्यांपूर्वी मुंबई येथे झालेल्या अपघातामध्ये पती सुरज देसाई यांचा मृत्यू झाला. पतीच्या आकस्मित जाण्यांने तेजस्विनी वर दुःखांचा डोंगर कोसळला अशा परिस्थिंतीत कुटुंबियांनी आणि तिच्या तीन वर्षाच्या मुलाचा पुढील आयुष्यांचा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला होता. माहेरचे व्यस्थिंत होते मात्र अशा परिस्थितीत पाटील व देसाई या कुटुंबीयांनी एकत्रित बसून धाडसी निर्णय घेतला त्यांनी अखेर तेजस्विनीच्या पतीच्या सख्या भावाची म्हणजेच दिरांशी लग्न लावून देण्याचा क्रांतिकारक निर्णय घेतला यावेळी उच्चशिक्षित सुधीरने या निर्णयाला मान्यता देत. एक समाजासमोर नवा आदर्श ठेवला आणि शुक्रवारी दिनांक 20 रोजी तेजस्विनी आणि सुधीर यांचा विवाह देसाई व पाटील व सर्व नातेवाईक ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत पार पडला. सुधीर आणि तेजस्विनीचा सत्कार काळगाव ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला या दोघांच्या कुटुंबीयांनी घेतलेला निर्णय हा क्रांतिकारक असून एक समाजासमोर आदर्शवंत असाच आहे. या लग्नामुळे पुन्हा एकदा तेजस्विंनीला सन्मानांने जीवन जगण्यांचा हक्क मिळाला . यावेळी सातारा जिल्ह्यांचे प्रतिनिधी संभाजी पुरीगोसावी यांनी या नवदांपत्यांशी दूरध्वनीच्या माध्यमांतून संपर्क साधून कौतुक व त्यांना पुढील वैवाहिक जीवनांच्या शुभेच्छा दिल्या