दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- भाजप नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या कामासाठी आणि बेधडक बोलण्यासाठी ओळखले जाताततुम्हाला काम हवं असेल तर मतं द्या,काम पटलं नसेल तर मतं देऊ नका,असे ते मतदारांना थेट सभेतून म्हणतात तसेच मोदी सरकारमधील सर्वात जास्त कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं.पंतप्रधान पदाच्या शर्यतीतला नेता म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं.गडकरींच्या मोकळ्या ढाकळ्या स्वभावामुळे आणि त्यांच्या कामच्या धडाक्यामुळे विरोधकही त्यांचे कौतुक करता आणि आभारही मानताना दिसून येतात.आता महाविकास आघाडीतील मंत्री आणि शेतकरी नेते बच्चूभाऊ कडू यांनी नितीन गडकरी यांच्यावर स्तुतीसुमनं उधळळी आहे.नितीन गडकरी हे पंतप्रधान असते तर रोजी रोटीचा प्रश्न मिटला असता असे वक्तव्य बच्चू कडू यांनी केल्याने पुन्हा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
बच्चूभाऊ कडू नेमकं काय म्हणाले?
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर स्तुतीसुमनं उधळताना बच्चू कडू म्हणाले,गडकरी चांगला माणूस असून,गडकरी पंतप्रधान झाले असते तर रोजी-रोटीचा प्रश्न मिटला असता आणि मोदी पंतप्रधान झाले तर आता मंदिर,मस्जिदचा प्रश्न मिटला,दोघांमध्ये हा फरक असल्याचे सांगत नितीन गडकरींवर एकाप्रकारे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी स्तुतीसुमने उधळली.शिवाय ज्यावेळी मोदींनी १०० रुपयांत गॅस वाटला त्यावेळी ४०० रुपयांत सिलिंडर मिळत होते आणि आज त्याची किंमत एक हजारच्या वर गेली असल्याची टीकाही राज्यमंत्री कडू यांनी केलीय.राज्यमंत्री कडू हे बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूरला रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यासाठी आले होते,यावेळी भाषणामध्ये त्यांनी मोदी आणि गडकरी यांच्यातला फरक सांगितला आहे.