दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी -श्रीकांत नाथे
अमरावती :- खासदार नवनीत राणा आणि रवी राणा आज बऱ्याच दिवसांनी दिल्लीतून अमरावतीत दाखल झाले.हनुमाना चालीसा आणि त्यानंतर झालेली जेल,हा वाद दिल्लीपर्यंत पोहोचला आहे.जेलमधून सुटल्यानंतर नवनीत राणा यांनी दिल्ली गाठत राज्य सरकार आणि पोलिसांनी संसदीय समिती आणि लोकसभा अध्यक्ष यांच्याविरोधात तक्रार केली.त्यानंतर हेच राणा दाम्पत्य संजय राऊत यांच्यासोबत खासदार नवनीत राणा आणि रवी राणा आज बऱ्याच दिवसांनी दिल्लीतून अमरावतीत दाखल झाले.हनुमाना चालीसा आणि त्यानंतर झालेली जेल,हा वाद दिल्लीपर्यंत पोहोचला आहे.जेलमधून सुटल्यानंतर नवनीत राणा यांनी दिल्ली गाठत राज्य सरकार आणि पोलिसांनी संसदीय समिती आणि लोकसभा अध्यक्ष यांच्याविरोधात तक्रार केली.त्यानंतर हेच राणा दाम्पत्य संजय राऊत यांच्यासोबत लडाख दौराही करताना दिसून आलं.त्यानंतर आज ते नागपुरात आले.यावेळी नागपुरात येताच नवनीत राणा आणि रवी राणा यांनी जोरदार घोषाबाजी केली.”जय हनुमान,जय संविधान,जय श्रीरामच्या” घोषणांनी यावेळी त्यांनी नागपूर दणानून सोडलं.माझ्या महाराष्ट्राला शनी लागला आहे तो दुर करण्यासाठी हनुमान चालीसा पठण करत आहोत,अशी प्रतिक्रिया यावेळी राणा यांनी दिली आहे.