दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रस्ते विकास केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरूच आहे. राष्ट्रीय महामार्गाचे जाळे मोठ्या प्रमाणात विणले जात आहेत. मोठी शहर महामार्गांनी जोडले जात आहेत. उदगीर-देगलूर या ६० किलोमीटरच्या रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार असून हे काम दोन-तीन टप्प्यात पूर्ण होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी १५७ कोटी रूपये निधी मंजूर झाला आहे. खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केलेल्या यशस्वी पाठपुराव्याला फलश्रुती मिळाले आहे.
उदगीर – देगलूर हा रस्ता ६० कि.मी. चा असून सदरचे काम २ ते ३ टप्यात पूर्ण होणार आहे. पहिला टप्पा १५७ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. सदर कामाच्या निविदा लवकरच निघतील. या कामासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, माजी आमदार सुभाषराव साबणे, देगलूर भाजपा तालुकाध्यक्ष शिवाजीराव कनकटे, कृषी उत्पन्न बाजार समिती देगलूरचे सभापती अनिकेत राजूरकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष पंकज
देशमुख आदींनी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यामार्फत मागणी केली होती. या रस्त्याच्या कामासाठी खा. चिखलीकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी याच्याकडे पाठपुरावा केला.
खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पाठपुराव्यामुळे उदगीर-देगलूर या ६० किलोमीटर मीटर रस्त्याचे काम अत्याधुनिक पद्धतीने सुरू होणार आहे. केंद्रीय यांच्या संकल्पनेतून देशातील विविध मोठी शहरे जोडली जात आहे. परभणी, हिंगोली असे जिल्हे जोडले जातांनाच उदगीर आणि ग्रामीण भागातूनही राष्ट्रीय महामार्ग गेल्यामुळे या भागातील दळणवळणाची साधने मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. दळणवळणाची साधने पडल्यानंतर निश्चितपणे नव्या विकासाची वाटचाल सुरू होणार आहे. याचा लाभ ग्रामीण कृषी क्षेत्राला मिळणार आहे. त्यामुळे उदगीर- देगलूर या नवीन रस्त्याचा हे कृषी क्षेत्रासाठी मोठा फायदा होईल, अशी प्रतिक्रियाही या निमित्ताने व्यक्त करण्यात आली आहे.
खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रयत्नांना रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यश : तीन टप्प्यांत रस्त्याचे भागात राष्ट्रीय महामार्गाने अनेक काम पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले.