दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
सफलता आणि असफलता यांचा खेळ म्हणजेच जीवन होय .प्रत्येक व्यक्ती च्या जीवनातील सफलता असफलता यांच परिगणित वेगळं असतं . जीवनातील कुठलिही असफलता हि अंतिम नसते.
सफलता हि जीवनातील अशी एक सकारात्मक घटना आहे ज्याचे जीवनातील विविध बाबींवर वेगवेगळे परिणाम होतात . प्रत्येक व्यक्ती च्या जीवनातील सफलता असफलता याच स्वरूप वेगवेगळे असते . आणि त्याचे परिणाम पण वेगवेगळे येणार हे नैसर्गिक तर आहेच पण तो निसर्गाने घालून दिलेला वस्तू पाठ सुद्धा आहे.
मेरा पाणी उतरता देख किनारे पे घर मत बसा लेना मैं समुंदर हू लोटके जरूर आऊंगा .
जीवनातील अनेक अपयश ,संकटं वादळं ,पचवल्या नंतर अनेक पराभव झाल्यानंतर एखाद्या सुवर्ण अक्षरांनी लिहावं असं यश किंवा एखाद्या विजय जीवनात मिळत असतो . मुळात कुठलिही असफलता हि शेवट ची संधी नसते . म्हणून असफलतेतुनच सफलतेचा जन्म घेत असते. याची जाणीव ठेवून वेळोवेळी,पावलो पावली आपण जागृत आणि सजग असलं पाहिजे.
मानवी जीवन आणि सफलता व असफलत यांचा घनिष्ठ संबंध आहे. जन्मा पासुन मृत्यू पर्यंतचा संघर्ष म्हणजे जीवन आणि या जीवनातील अनेक वेगवेगळ्या बाबी , आपल्याला मिळविण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. झगडावं लागत अनेक सुख दुःखांचा समाना करावा लागतो .अनेक लोका असे आहेत की त्यांना आपल्या जीवनात प्रत्येक बाब पहिल्या प्रयत्नात मिळते . महणजे अगदी सहजा सहजी मिळते.किंवा फार प्रयत्न न करता सुद्धा मिळते याचा अर्थ प्रत्येकाला याच पद्धतीने सफलता मिळेल असं नाही .त्याच गणित प्रत्येकाच्या जीवनात वेगळं आहे. अनेकांना प्रयत्न करूनही ती बाब मिळत नाही .आणि अनेक लोकांना पहिल्या प्रयत्नात सफलता मिळाली नाही तर ते थेट प्रयत्नच करणं बंद करतात . आणि खरा घोळ इथंच आहे. उलट सफलता का मिळाली नाही आपण असफल का झाले याचे सद्सद विवेक बुद्धी नुसार मुल्यमापन करून मंथन चिंतन करण क्रमप्राप्त आहे . तसेच अगदी बारकाईने निरीक्षण करून असफलता मिळाली म्हणून नाराज न होता न थकता .ताण तणाव न घेता अगदी सहज आणि ज्ञान पुर्वक संशोधन करून अगदी बाराकाईने असफलते च्या मुळाशी जाऊन सफलता मिळविण्या साठी प्रयत्न केला पाहिजे. आपली , शक्ति, ताकद, मनोधैर्य, जिद्द, चिकाटी, मेहनत, प्रचंड आत्मविश्वास आणि नियमित नियोजन बद्ध प्रयत्न केले पाहिजेत जेणेकरून कुठल्याही क्षणी असफलतेच रूपांतर सफलतेत होईल कारण सृष्टी च्या रचनेनुसार नैसर्गिक नियमानुसार असफलते च्या उदारातुन सफलता हि नेहमी जन्मला येत असते . पण त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सदैव नियमित न थांबता केली पाहिजे . प्रयत्न थांबले कि सगळं संपलं म्हणून असफलतेला सफलतेत परिवर्तित करे पर्यंत प्रयत्न थांबले नाही पाहिजे . एवढी क्षमता आपल्या मध्ये निर्माण झाली तर नक्कीच आपणं असफलते ला सफलतेत परिवर्तित करू शकतो.अगदी सहजपणे.
गणेश खाडे
संस्थापक वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक 9011634301